Skip to main content

Posts

Showing posts from October 31, 2019

*तरुण वयात नामस्मरण का करावे ...?*

 *तरुण वयात नामस्मरण का करावे ...?* तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मुले हुशार असतात matured असतात.तरुण रक्त अंगात सळसळते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होवून ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते.म्हातारपणी **नामस्मरण** होत नाही कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्या कडून *नामस्मरण* झाले तरीही ते देवाला पोहचते. पण दैवीशक्ति त्यांना मिळत नाही. तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते. *नामस्मरण* हे तरुंणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते.त्या *नामस्मरणाच्या* अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते.नामस्मरण का कारायचे असते? कारण तरूण वय हे अल्लड़ असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचारांन