Skip to main content

*तरुण वयात नामस्मरण का करावे ...?*

 *तरुण वयात नामस्मरण का करावे ...?*


तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मुले हुशार असतात matured असतात.तरुण रक्त अंगात सळसळते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होवून ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते.म्हातारपणी **नामस्मरण** होत नाही कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्या कडून *नामस्मरण* झाले तरीही ते देवाला पोहचते. पण दैवीशक्ति त्यांना मिळत नाही. तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते. *नामस्मरण* हे तरुंणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते.त्या *नामस्मरणाच्या* अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते.नामस्मरण का कारायचे असते? कारण तरूण वय हे अल्लड़ असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त *नामस्मरणचं* करते.त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधी फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृत्यु येईल हे सांगता येत नाही. पण *नामस्मरनाने* खुप काही समस्या जीवनात सुटु शकतात. हल्लीच्या मुलांना नेट,टीव्ही, मोबाइल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही. सतत तेच तेच जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाइट विचार येतात. बारीक सारिक गोष्टींवरून चिड़तात. लगेच राग येतो काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसर्यांचा घात करतात. पैशांसाठी व्याभिचार करतात. पैसा श्रेष्ठ आहे संस्कार कमी आहेत अशी ह्यांची विचारसरणी असते. त्यात त्या स्पर्धा परीक्षा स्वताच्या आत्म्याला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते. दुसर्यांच्या पुढे जाने खुप पैसा कमविणे हेच ह्यांचे ध्येय असते.पण मन ह्या सुखवस्तु मिळाल्यामुळे विचलीत होवून काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. ह्या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते. *नामस्मरनाने* एक वेगळीच दैवीशक्ती प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले सर्व लक्षात राहते. वाइट कर्म करायला मन त्या मुलांचे घाबरते. कारण मनात नामाची माळ जपली जाते.तरूण मुले वाइट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. *नामस्मरणामुळे* खुप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जस जसेनामस्मरण वाढते तस तसे दैवी शक्ती वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाईट प्रसंग आला कि देव त्यांचे रक्षण करतो. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहर्यावर makeup ची गरज भासत नाही.तर आपोआप तेज येते. तरुण मुले आणखी सूंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होतो.चिंता भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते.देवालाही सूंदर ताजे फुल आवडते म्हणजेच तरुण काळा असो या गोरा पण त्याचे सूंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात *नामस्मरण* करायचे असते. म्हातारपण आता कोणी पाहिले आहे. मृत्यु कधी येईल सांगू शकत नाही आज मी लेख लिहीतो उद्या तुम्हाला दिसेन की नाही सांगू शकत नाही. म्हणून देवाचे दिवसातून एकदातरी *नामस्मरण* करा कारण जीवनातले खरे अमृत तेच आहे.🙏👏🌺🙏


Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...