Skip to main content

Posts

Showing posts with the label आठवणीतील कविता

आठवणीतील कविता

१. ।।आठवणीतील कविता ।।  दहा दिवस दहा कविता  3 जुलै 2020      नमस्कार!  मी वृंदा अरविंद जोगळेकर.  आज माझ्या  आठवणीतील  आवडती कविता सादर करीत आहे.मला या उपक्रमात माझी मैत्रीण वर्षा विजय देशपांडे हिने आमंत्रित केले आहे आणि मी माझी मैत्रीण अनघा नासेरी हिला  या उपक्रमात सहभागी  करतेय. या उपक्रमातील  माझी ही पहिलीच कविता आहे आजची माझी पहिली कविता म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे .  आकाशातले काळे दाट मेघ आषाढ महिन्याची नांदी देतात आणि चंद्रभागेच्या काठावर विठ्ठलभक्त जमू लागतात. गोपीचंदनाची उटी आणि तुळशीच्या माळांचा साज चढवलेले हे वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करताना टाळ-मृदंगाच्या तालावर देहभान विसरतात. राग-लोभ, मोह-माया यांच्या पलिकडे जाऊन केवळ भक्ती हाच भाव प्रत्येकाच्या मनात उरतो. रंग-रूप, जात-पात, लहान-थोर, उच-नीच कसलाही भेदच उरत नाही. सारा आसमंत विठोबामय होतो. निर्मळ भक्तीची ही पायवाट हा भवसागरातून आपल्याला तारून नेईल असा विश्वास तुकोबा प्रत्येकाच्या मनात जागवतात.  यंदा पंढरीची वारी होऊ शकली नाही. पण हे चित्र प्रत्य...