Skip to main content

Posts

Showing posts with the label डोम्बिवली चा इतिहास खुप सूंदर माहिती.

माझे माहेर डोंबिवली

माझे माहेर डोंबिवली.  किती मस्त लिहिलंय....👌👌👌 माझ्या आठवणीतील डोंबिवली डोंबिवली एक निद्रिस्त खेडं होतं. येथे रेल्वे येताच गाव होण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्या काळात दोनच प्लॅटफॉर्म होते. असं सांगतात कि ते आजच्या सारखे उंच नव्हते. जमिनीवरच उतरावे लागे. तेव्हा वस्ती ही फार नव्हती तर गर्दी कुठून येणार? येथल्या भूमिपुत्रांची संख्याही कमी. तेव्हा तरी त्यांना ट्रेनची गरज भासत नव्हती. रेल्वे येताच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने वसाहतीसाठी जागा दिली. तीच आज अवशेष स्वरुपात असलेले बारा बंगले आणि बावनचाळी. एके काळी विजेच्या चमचमाट्यानं चमकत होती. इंग्रजांनी ह्या गावाला डिमॉली असं नाव दिल. पुढे डिमॉलीच डोंबिवली झालं. एक महत्वाची आठवण म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या पलीकडे म्हणजे डोंबिवलीच्या पश्चिमेकडे एक तळं होतं. त्यात घन:श्याम गुप्ते यांची एक होडी असायची. हे गुप्ते पुढे डोंबिवलीचे सरपंच झाले. ह्या गुप्त्यांनीच दिल्लीपर्यंत स.गो. बर्वे यांची मदत घेऊन बदलापूरहून नळाचं पाणी आणलं. डोंबिवली त्याकाळात किती निवांत होती हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकरांनी एके ठिकाणी सांगितलं आहे....