Skip to main content

*काय वाढले पानावरती*


गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*

      *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.*

हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...!

*काय वाढले पानावरती..!*

काय वाढले  पानावरती, 
ऐकून घ्यावा थाट संप्रती,
धवल लवण हे पुढे वाढले, 
मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले, 
आणि लिंबू रसरसलेले,
किसून आवळे मधुर केले,
कृष्णा काठचे वांगे आणले,
खमंग त्याचे भरित केले,
निरनिराळे चटके नटले,
चटण्यांचे बहु नवे मासले,
संमेलनची त्यांचे भरले,
मिरची खोबरे ती सह ओले, 
तीळ भाजूनी त्यात वाटले,
कवठ गुळाचे मिलन झाले,
पंचामृत त्या जवळी आले,
वास तयांचे हवेत भरले,
अंतरी अण्णा अधीर जाहले!
भिजल्या डाळी नंतर आल्या,
काही वाटल्या काही मोकळ्या,
काही वाटुन सुरेख तळल्या, 
कोशिंबिरी च्या ओळी जमल्या,
शुभ्र काकड्या होत्या किसल्या,
मुळा कोवळा मिरच्या ओल्या, 
केळी कापून चकल्या केल्या,
चिरुन पेरुच्या फोडी सजल्या,
एकरूप त्या दह्यात झाल्या,
भाज्या आल्या आळू-घोसाळी,
रान कारली वांगी काळी, 
सुरण तोंडली आणि पडवळी,
चुका चाकवत मेथी कवळी,
चंदन बटवा भेंडी कवळी,
फणस कोवळा हिरवी केळी,
काजुगरांची गोडी निराळी,
दुधी भोपळा आणि रताळी,
किती प्रकारे वेगवेगळी,
फेण्या, पापड्या आणि सांडगे,
कुणी आणुनी वाढी वेगे,
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या,
खिरी तयांच्या शोभत होत्या,
शेवयांच्या खिरी वाटल्या,
आमट्यांनी मग वाट्या भरल्या,
सार गोडसे रातंब्याचे,
भरले प्याले मधुर कढीचे,
कणीदार बहू तूप सुगंधी,
भात वाढण्या थोडा अवधी.........

*-ग दि माडगुळकर.*

गदिमांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचे हे एक सुंदर उदाहरण


 चितळे २४५ प्रॉडक्ट बनवतात.
पैकी २४० ची माहितीच नव्हती.
दु. १ ते ४ बंद हा पुणेरी बाणा वाटत होता.
पण तसं नव्हतं.
जोक व्हायरल करणाऱ्यांचं काय जातंय?
दुधाचा धंदा पहाटे ३ वाजता सुरू होतो.
गावोगावच्या गवळ्यांना प्राधान्य देऊन चितळे कुटुंब गेली ७८ वर्षे पहाटे तयार असतं.
याबद्दल कुणी बोललं नाही.
भिलवडी आणि पुण्यातून स्थानिक दीड हजार कर्मचाऱ्यांना घेऊन चितळे कुटुंब एकोप्याने उभं आहे.
दुग्धजन्य पदार्थांच्या स्पर्धेत एक मराठी कुटुंब टिकून आहे ते अॅटिट्यूडमुळे नाही तर अपार कष्टाने.
परवा ठाण्याच्या इंद्रधनु उत्सवात चितळे कुटुंबियांची मुलाखत घेताना सुधीर गाडगीळ वारंवार १ ते ४ वर बोट ठेवत होते. पण चितळे कुटुंबियांनी हसत हसत सांगितलं की दादासाहेब चितळे ८३व्या वर्षी मध्यरात्री उठून आजही १४ तास काम करतात. सायंकाळी उशिरापर्यंत दुकानं सुरू राहतात. अशावेळी १ ते ३ ब्रेक तो बनता है.
मात्र तरुण इंद्रनील सांगत होता. आता तंत्रज्ञानामुळे बर्‍याच गोष्टी सोप्या झाल्यात. त्यामुळे दुपारी १ ते ४ चितळेंची दुकानं उघडी राहणार आहेत.
बातमी त्याचीच झाली. 
अर्थात मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही जाणं टाळणारे पुणेकर १ जुलैनंतर चितळेंकडे दुपारी बाकरवडीसाठी रांग लावतात का हे पाहणं इंटरेस्टिंग असू शकतं.

फक्त दुकानाची वेळ बदलणे किंवा सुधारणे,
ही सुद्धा ब्रेकिंग न्यूज बनते, 
याला म्हणतात धंद्याचं यश..!

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...