Skip to main content

फेसबुक, ट्विटर ने व्यापून टाकले आपल्याला

03/03/17, 5:18 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
04/03/17, 3:45 AM - Abhay Hole SHS: रोजसारखीच सकाळ झाली !
व्हॉट्सअप तुणतुणले,
न उघडताच कळले !!
ग्रुप्सवर "गुड मॉर्निंग" किणकिणले !!

पण, मी पाहिलं नाही !
तडक उठलो आणि...
मोबाइलही नसलेल्या एका मावशीशी बोललो,
वयाने थकलेल्या तिच्या थरथरत्या आवाजात
मायेनं किणकिणली,
"काळजी घे गं" तिला म्हटलं,
डोळ्यात पाणी तरळलं
का...? .
कळलं नाही.

फेसबुक क्लिककडे सवयीने हात गेला,
फेस फिरवून मी तो दुसरीकडेच नेला.

शेजारच्या काकांकडे डोकावले...
त्यांचा "फेस" कित्येक दिवस पाहिला नव्हता,
त्यांना तब्येत विचारली...
ते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले..
जाता जाता म्हणाले...
सांभाळ रे.. किती धावपळ करतोस..!
मी नकळत वाकलो...
पायाला हात लावले.
का...? .
कळलं नाही.

दिवसभर व्हॉट्सअपवर जोक्स येत राहिले,
आणि ..
"मस्ट शेअर पोस्ट" नी तर
व्हॉट्सअप भरून वाहिले..
तरी अजिबात उघडले नाही.

सकाळ संध्याकाळ,
जेवलास का..., निघालास का... म्हणत
माझ्या काळजीचा वसा घेतलेल्या आईला
स्वत:हून फोन लावला
"काय रे .. काय झालं..."
तिचा स्वर कापरा झाला,

तेव्हा कळलं कामाशिवाय करतच नाही तिला फोन !
अपराधी वाटून मी बोलत राहिलो..
बोलतच राहिलो.. ती तृप्त होईपर्यंत !
शेवटी तीच म्हणाली...
अरे देवा..
गॅसवर दूध आहे.. ठेवते रे.!!
दूध नाही..
पण काहीतरी नक्कीच ऊतू गेलं...
का...? .
कळलं नाही.

संध्याकाळ झाली...
घरी आलो लवकर
फेसबुक ट्विटर चिवचिवत होतंच
पण आजूबाजूला चिवचिवणा-या
माझ्या चिमण्या बाळांशी
चक्क गप्पा मारत बसलो
त्यांच्याशी खेळलो...
खूप हसलो !
त्यांचा तो चिवचिवाट
खूप खूप गोड वाटला.
का...? .
कळलं नाही.

रात्री बायको जेवण वाढत होती
फोन दिसणार नाही इतका दूर ठेवला
कढी खूप झक्कास होती..
भुरका मारत प्यायलो..
नुसतंच "लाइक" नाही तर
कमेंट करून टाकली...
बायको गोड हसली

या आधी कधी अशी हसली होती.. ?
आठवलं नाही...

अंथरुणावर पडलो तेव्हा...
उशाजवळच फोन होता.
दिवसभरात माझं
एकही शेअर नाही..
की पोस्ट नाही
काय बोलणार.. आता !

कुणाचेही लाइक येणार नव्हते
कुणीही कमेंटही करणार नव्हते
कुणाच्या रिप्लायचीही वाट बघायची नव्हती
आजचे "लाइक्स"
आजचे "कमेन्ट"
आजचे "रीप्लाय"
सारे माझ्या डोळ्यात होते..
त्यांना जपत मी डोळे मिटले...

ब-याच दिवसांनी...
त्या रात्री खूप छान झोप लागली...
का...? .
कळलं नाही.

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...