Skip to main content

एक आठवण..१८.४.२०१८

वारीच्या रस्त्यात दुपारी निघायचं
Sandhykali पिठलं खिचडी 3 दगडांच्या चुलीवर रांधून  खायचं आणि पुढे रात्री चालायचं 
कशी वाटते आयडिया! Dr.Vasanti ने लिहले..

मी: Idea मस्तच आहे। काल response द्यायचा राहून गेला। 
अगदी जुन्या काळच्या लोकांची आठवण झाली। 

2010 मधे मी एकटीच लोणार ला गेले होते..लोणार हे आमचे मूळ गाव...पण नोकरी निमित्त आजी आजोबा बाहेर पडले आणि गाव मागेच राहिले।फार लहान असताना एका लग्ना साठी गेलेले आठवते ते तेव्हढेच। मुलांना न्यायची फार इच्छा होती, शाळेत असे तो वर सर्व दाखवावे, पुढे ती आपली राहत नाही,  पण high स्कूल आणि ही जीवघेणी competition, त्यांना डोके वर कडू देईल तर शपथ..आई बाबांना पण जमत नव्हते.. कोणालाच वेळ नाही...करतकरत ४-५ वर्षें मी लोणारचा प्रोग्राम लांबवला, शेवटी एकटीच गेले। MTDC चे lodge online book केले। आई बाबांच्या आठवणीतले लोणार पार बदलले होते, lodge एकदम झक्कास वाटले। दुराऱ्या दिवशी तळ्यातल्या मंदिरात जायचे होते, पहाटे तयार होऊन निघाले तर खरी.. पण एकटीला धाकधूक वाटत होती..वाघ आला तर। खेड्यात ले एक कुटुंब आजी आजोबा आई बाबा नातवंड माझ्या सोबत होतें, मी त्यांच्या मागोमाग बोलत निघाले। बाईंनी सांगितले, मुलाची मुंज आहे, देवीच्या मंदिरात, मला आयतीच सोबत मिळाली, मी खुश झाले। पण खाली तळ्यात उतरताच ते कुटुंब एक आडोश्याला थांबले। मी गडबडले। काय झाले? आता नास्ता पानी करून मंगच निघणार। अरे देवा। इथे तर काहीच नाही, आणि नास्ता पाणी? 
पाहता पाहता तिने ३ दगडाची चूल मांडली, नवरा आणि आजोबा काटक्या गोळा करून घेऊन आले। मला मात्र आता tension आले। असे नास्ता पाणी करायला बसले तर सूर्य डोक्यावर येईल। पण मला एकटी ला वाट माहीत नव्हती शिवाय जायची पण भीती वाटत होती। लहापणापासून आजोबाच्या शब्दात त्यांनी मारलेला या अभयारण्यात ला माणसाला खाणारा वाघ आठवला। सोबत तर हवीच। पण त्या कुटुंबाची, मी आज मुंजी आलेली पाहुणी  होती, असा पाहुण्याला बरं जाऊ देतील..विन्मुख। चहा तरी प्याच। म्हणजे इथे ही चहा करणार की काय? तिने आपले गाठोडे उघडून, एक एक पुड्या काढल्या..चुली वर चहा केला आणि मला स्टील च्या लांब ग्लास भर चहा दिला। 
एकी कडे माझ्या करिता सोबत शोधणे पण चालू होते आणि काय सांगायचे खुद्द मंदिरातील पुजारीच आले, जा की यांच्या सोबत..मलाही हुश्श वाटले, अगदी पॉईंट टू पॉईंट सोबत मिळाली म्हणून...
पण अजून तो ग्लासभर चहा हातात होता, एकतर मी नास्ता करून निघाले होते, दुसरे तो 'चाय कम पानी ज्यादा' चहा, तिसरे हे पुजारी अगदी या कुटुंबातल्या लोकांच्या विरुद्ध...अतिशय मुखदुर्बळ.. एका शब्दाने बोलायला महाग आणि चहा संपे पर्यंत थांबायला तर त्याचे विमान चुकले असते असा आव, चौथे एवढ्या प्रेमाने दिलेला चहा मला टाकवत पण नव्हता, पाचवे माझा एक मोठठा प्रॉब्लेम? मला काढत चहा अजिबात पिता येत नाही...एवढ्या रम्य ठिकाणी येऊन काय ही त्रेधातिरपीट। 

खरं तर, मला त्यांच्या बरोबर नास्ता करूनच निघायला हवे होते, पण आपण शहरी लोकं। आपल्याला वेळेचं नको तेव्हा फारच भान राहतं।
आणि त्यात ते आजोबा वजा पुजारी...2 मिनिटे उशीर झाला म्हणून जे स्पीड ने चालत सुटले, मला वाटतं... walking च्या race मधे नक्की पाहिले आले असते...मला वाटेत फोटो काढायची पण मुभा नव्हती....मी तर अक्षरशः थोडी चालायची थोडी धावयाची.. त्यांच्या speed ला match करायला। शेवटी जीव मुठीत घेऊन, वाघ मागे लागला की काय, असे धापा टाकत, आमचे बिन व्यायामाचे शरीर पोहचले मंदिरापर्यंत। पण का कोणास ठाऊक, आज ही, मी तो दगडा वरचा नास्ता खूप miss करते आहे। मंदिरापर्यंत तर मी पोहचले असतेच, थोडा उशीर झाला असता एवढेच।
Vandana Vilas Vaidya

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...