Skip to main content

Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप ३.५.२०१८

२-३ दिवसापासून शाळेच्या व्हाट्सअप्प group वर अनेक silent readers आहेत आणि त्यांना बोलते कसे करायचे हे वाचण्यात आले।
तशी मी खचितच silent असते, पण गेल्या आठवड्यापासून माझी आत्म शुद्धी चालली होती।
आज माझ्या ट्रिप चा शेवटचा टप्पा गाठला। 
ही ट्रिप मी संपूर्ण Tatkal bookings करून आणि कमीतकमी खर्चात करायची ठरवली।
ह्या ट्रिप चे नाव आहे 'Senior Citizens मुंबई पुणे ट्रिप'. म्हणजे सर्व घरातील ८० च्या दरातील seniors ला भेटणे।
स्वार्थ आणि परमार्थ म्हणायला हरकत नाही। करण त्यात शाळेतील आणि कॉलेज मधील मित्र मैत्रिणींची पण भेट घेतली आणि मनसोक्त गप्पा टप्पा खाणे सर्व झाले। 
पहिला टप्पा मंत्रालयम, येथे घेतला, तेथे श्री राघवेंद्र स्वामी यांचे आंध्र आणि कर्नाटक राज्यात फार followers आहेत। अनेक वर्षांपासून ही जागृत समाधी पहायची होती, तिचे दर्शन झाले।
मग मुंबईला , पहिला याप्पा डोंबिवली -मामा(७०चे) ठाणे -नितीन कांजूरमार्ग-मामेभाऊ, बांद्रा-प्रशांत डोंगरे, बोरिवली-मावशी (८०)। पुढे पनवेल जवळ रसायनी ला बाल मैत्रिणीची भेट।
नंतरचा टप्पा, पुणे। 10 वर्ष शेजार असलेले पाठक - आज industrialist मध्ये जाणतात --त्या ८७ yrs च्या काकांना आणि काकूंना (८०) भेटून आले।
तिथून अथश्री मधे आत्या ८० आणि काका ८५, यांच्या सोबत मनसोक्त गप्पा, तिथेच आतेभाऊ भावजय भेटली।
काल संध्याकाळी SGM Mall मधे Xaviers च्या batchmates ला भेटले , पण सॉरी हं। आपल्या सोमलवरच्या batchmates ला भेटायचे राहून गेले, पण आपल्या येत्या gtg ला भेटूच।
काल रात्री पुणे सोडले- बेंगलोर च्या वाटेवर गाणगापूरला ला शेवटचा टप्पा करून, माझ्या या ट्रिप ची सांगता करून, आज सायंकाळ च्या उद्यान ने बंगलोर ला रवाना होणार। 
मागील 3 वर्षात US च्या वास्तव्यामुळे, भारतातील भेटीगाठी बंदच होत्या, शिवाय असे मनसोक्त थोडक्या पैशात अगदी वेळेवर plan करून जाण्यात खूप मजा आली। आता परत उद्यापासून routine सुरू करायला सज्ज व्हायचे आहे- या मनोरम आठवणींचा खजिना घेऊन। विशेष म्हणजे ट्रॅव्हल light चा मंत्र घेतल्यामुळे सर्व सहज शक्य झाले।
मग उद्या पासून येते रेग्युलर - group वर.....😍
Vandana Vilas Vaidya

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...