Skip to main content

काही आठवणीतील पावसाळे

पावसाचे वर्णन नागपुरकर आणि पुणेकर कराकडून काही दिवसांपासून खूपच वाचण्यात आले। मग मीही थोडा ताण देऊन, माझे नागपूर मधील लहानपणीचे पावसाळी दिवस आठवले। प्रामुख्याने आठवले ते, संपूर्ण परिसर धुतल्यागत स्वच्छ आणि हिरवागार व्हायचा आणि वातावरण मंद आणि कुंद व्हायचे। विशेष आठवण म्हणजे घरी थांबून दुलई किंवा पांघरून घेऊन आईच्या कुशीत दुपारची झोप काढायची। बाहेर पाऊस म्हणजे ओघाने घरी थांबणे आलेच आणि वातावरण थंड झाल्याने, भजी, गरम चहा आणि उबदार पांघरून...
पुढे मुंबईला गेल्यावर...
मुंबईतल्या पावसाला, तशी मजा मला कधीच जाणवली नाही, कारण दडलेली घाण खळखळ वाहत जात पाहताना कसली आलीय मजा। हो पण तेच समुद्रकाठी गेले तर आणि Gate Way of India ला गेले तर, एक आगळाच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळे। तो खवळलेला समुद्र आणि अंगावर उडणारे तुषार, त्याचा तो रुद्रावतार पहिला की पूर्णपणे मी हरखून जात असे... जसे तो आपल्याला, आपण किती क्षीण /खिसगणती आहोत या पृथ्वीतलावर, याची जाणीव करून देत असे।
बंगलोर ला आलो आणि पावसाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले..रोज दुपार झाली की अभाळलेले..आणि केव्हा तरी 10-15 मिनिटे तो जोरधार कोसळनार आणि कोसळून झाले की, पुन्हा पूर्ववत। तेव्हा बंगलोर हे 'Garden City' नाव किती सार्थक आहे हे कळले, पण रोजचाच पाऊस झाला की मग त्यात कौतुकाचा भाग काहीच उरतच नाही, नाही का? पण एव्हढे मात्र निश्चित, की बंगलोर च्या बाहेर पडले की मग मात्र त्याचे खूप खूप कौतुक वाटते, या पावसाचे, या 12 ही महिने थंडगार वातावरणाचे...आणि या सर्वांची आपल्याला कशी सवय लागते आणि हे कळण्याआधीच आपण त्या हवामानाशी कधी एकरूप झालो हे कळतच नाही।
Upstate NY चा पाऊस पण बंगलोरच्या पावसासारखाच । सतत पाऊस...आणि थंडी असली की बर्फ..अगदी डोळ्याला खिळवणारा...पाऊस पण आणि बर्फ पण..दूर दूर पर्यंत सौंदर्यचं..कधी काळे पांढरे तर कधी दुधासारखे शुभ्र...आणि त्या पावसानंतर तो 180° मधे दिसणारा इंद्रधनुष्य....सगळे वसाळी picture आणि वर्णन पोस्ट्स पाहून, मला असे आतापर्यंतच्या आयुष्यातळे माझे काही आठवलेले पावसाळे!

Vandana Vilas Vaidya

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...