Skip to main content

*ऊसाच्या मुलांची लग्न*

*ऊसाच्या मुलांची लग्न*
*कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान आहे वाचा सर्वानी एकदा*

ऊसाला झाली दोन दोन पोरं,
मोठा मुलगा *'गुळ'*अन् 
धाकटी मुलगी *'साखर'*.

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,
गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर.

साखर तशी स्वभावाला गोड,
तिच्यात उणेपणा शोधणं अवघड.

गुळ मात्र स्वभावाला चिकट,
समोर दिसला की ईतरांना वाटे संकट.

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई,
गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही.

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,
गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता 'ओबडधोबड'.

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,
बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले.

तीला झाला एक मुलगा
दिसायला होता तो गोरागोरा,
यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले *'शिरा'.*

ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची,
त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ?

ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग,
सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग.

बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना,
काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना.

ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप,
त्याने प्रयत्न केले खुप,
अन् ऊसाला आला हुरुप.

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,
जी दिसायला होती बेत्ताची.

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,
होते ऊसाच्या तोलामोलाचे,
ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे.

अंगाने ती होती लठ्ठ नी जाडजुड,
रुपाला साजेसे, नांंव होते तीचे *'भरड.*

गव्हाला मुलीच्या रुपाची होती कल्पना,
तो कशाला करतो नसत्या वल्गना ?

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,
लग्न जमले अन् सारे तयारीला लागले.

किचन ओटा झाला,
लग्नासाठी बुक,
स्वयंपाकघर पण सजविले खुप.

'भरड' ला तूप कढईत घेउन गेले,
तेथेच् तीचे खरपुस मेक-अप पण केले.

भरपुर लाजली 'भरड', अन् झाली गुलाबी,
गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली 'शराबी'.

लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले,
अन् हळुच् त्याने गुळाला कढईत पाचारीले.

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश.

मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला,
'भरडी'चे रुप पाहुन, वेळ नाही लागला पाघळायला.

काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता,
कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता.

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,
थाटामाटात बारसे झाले,
नांव ठेवले *लापशी*

आवडली ना 😁

Author unknown

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...