Skip to main content

सारस्वत मासे खाऊनही पवित्र ब्राह्मण कसे ?

👇🏻👇🏻 नक्की वाचा कथा.👇

दधीचि ऋषी आणि अलंबुजा अप्सरा यांचा मुलगा सारस्वत. इंद्राच्या सवयीनुसार दधीचीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी त्याने अलंबुजेला दधीचीकडे पाठविली होती. ती सरस्वतीच्या पात्रातून बाहेर आली. दधीचि तिथे स्नानासाठी आला होता. अलंबुजेने त्याला काममोहित केले. तपश्चर्या त्याने अर्धवट सोडली. तिच्याभोवती पिंगा घालण्यातच त्याचे दिवस जाऊ लागले. काही महिन्यांनी अलंबुजेला मुलगा झाला. त्याला दधीचिपाशी ठेवून ती स्वर्गात निघून गेली. ती सरस्वतीतून आली होती व तेथेच त्यांची प्रथम भेट झाली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून दधीचिने मुलाचे नाव ठेवले *सारस्वत*. दधीचिने त्याला वाढवले व वेद-वेदांग-शास्त्रांत पारंगत केले.

दधीचीने देवांना आपली हाडे देण्यासाठी प्राणत्याग केला. त्यानंतर देशाला अवर्षणाने ग्रासले. अन्नपाण्यासाठी लोक सैरावैरा भटकू लागले. ऋषीही तेच करू लागले. पठणासाठी त्यांना वेळ मिळेना. त्यामुळे त्यांचे ज्ञान पूर्ण हरवले. एकटा सारस्वत मात्र समुद्राकाठी राहिला. मासे खाऊन त्याने जीव जगवला. समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचे गोडे पाणी तो पीत असे.

दुष्काळ संपला. आपले ज्ञान विस्मृतीच्या पडद्याआड गेल्याची ऋषींना जाणीव झाली. पुन्हा एकदा अध्ययन करण्यास ते सिध्द झाले. पण अध्यापन करणार कोण? ज्ञान कोणापाशीही नव्हते. बरीच भटकंती केल्यानंतर त्यांना सारस्वत सापडला. रोजचे पठण करत होता. जसाच्या तसा तेजःपुंज होता.

"सारस्वत ! आम्ही आमचे ज्ञान विसरलो. तू तुझे ज्ञान टिकवलेस कसे?" त्यांनी कुतूहलाने विचारले. सारस्वताने समुद्राकडे बोट केले. ऋषींनी भिवया उंचावल्या.
"खारट पाणी पिऊन जगलास?"
"नाही. मासे पकडले. गोड पाणी आहे जवळच." सारस्वताची प्रांजळ कबुली ऐकताच ऋषींमध्ये स्मशानशांतता पसरली. सारस्वताने मासे खाल्ले म्हणजे अभक्ष्यभक्षण केले. तो बाटला. त्याचे पावित्र्य ढळले. अशा अपवित्र माणसाकडून वेदांसारखे पवित्र ग्रंथ कसे काय शिकायचे? त्यांच्या मनात विचार सुरू झाले. एवढ्यात एका स्त्रीचा आवाज ऐकू आला.

"सर्वसामान्य धर्मनियम आणि आपदधर्म यात फरक आहे. आपदधर्म म्हणजे आपत्तीला तोंड देत असताना पालन करावयाचे धर्मनियम. हे धर्मनियम नेहमीच्या नियमांपेक्षा खूपच शिथिल असतात. आपत्तीकाळात अनेक प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य घ्यावं लागतं. कारण जीव जगवणं महत्त्वाचं असतं. सारस्वतानं मासे खाल्ले, हे खरं आहे. पण दुष्काळामुळे खाल्ले. मासे खाऊन त्याने जीव जगवला. म्हणून त्याला वेद सांभाळून ठेवता आले. आज या सबंध पृथ्वीवर वेद, वेदांग, शास्त्र जाणणारा तो एकटा आहे." ऋषींनी मागे वळून पाहिले. नदीकाठी साक्षात देवी सरस्वती उभी होती. सर्वजण तिच्या पाया पडले. तिने सर्वांना भरघोस आशीर्वाद दिले. सारस्वताला तिने एक खास वर दिला.

"मासे खाल्ले तरीही सारस्वताचं पावित्र्य भ्रष्ट होणार नाही असा मी त्याला वर देते. हा वर त्याच्या वंशजांनाही लागू होईल. त्यांनीही मत्स्यभक्षण केले तरी ते पवित्रच राहतील व वेदाभ्यासाचा त्यांचा अधिकार कायम राहील." सरस्वती म्हणाली व अंतर्धान पावली.

सर्व ऋषींनी सारस्वताकडून वेद, वेदांग, शास्त्रे पुन्हा शिकून घेतली. कांडानुक्रम नावाचा ऋग्वेदाचा एक पाठ सारस्वताच्या नावावर आहे. परंतु उपलब्ध नाही.

सरस्वतीच्या वरामुळे मासे खाऊनही सारस्वत ब्राह्मणांचे पावित्र्य अबाधित रहाते.

( संदर्भः ऋषींच्या महान गोष्टी )
Posted as received

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ