Skip to main content

वयानुसार आपण काय काय .. गोष्टी सोडल्या

वयानुसार आपण काय काय ..
गोष्टी सोडल्या..

*आपण गाभुळलेली चिंच ..*
*अनेक वर्षात खाल्लेली नाही*

*जत्रेत मिळणारी ..*
*पत्र्याची शिट्टी ..*
*वाजवलेली नाही.*

*चटक्यांच्या बिया घासून ..*
*चटके द्यावेत ..*
*असं आता वाटत नाही*

*सर्कसमधला जोकर आपलं ...*
*मन आता रिझवू शकत नाही.*

*तसंच कापसाची म्हातारी ..*
*पकडण्याचा चार्मही ..*
*राहिलेला नाही..*
*कारण ..*
:
*कापसाच्या म्हातारीने ..*
*उडता उडता आपला ..*
*बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..*
*ते आपल्याला कळलंच नाही.*

*आता त्या सहली नाहीत...*

*दोन दोन मुलांच्या ..*
*जोड्या करून ..*
*चालणं नाही..*

*विटी दांडू नाही...*
*गोट्या*लगोरी*

*साबणाचे फुगे नाहीत..*

*प्रवासात बोगदा आला तर ..*
*एक अनामिक हुरहूर नाही..*

*त्या उडणाऱ्या म्हातारीने ..*
*हे सगळे आनंद नेले...*
*त्याच्या बदली ..*
*तिचं वार्धक्य तिने ..*
*आपल्याला दिलं...*

*म्हणूनच ती अजून उडू शकते...*
*आणि आपण जमिनीवरच आहोत.*

*लाटेने की काळाने ...*
*नेला तो मातीचा किल्ला?*

*भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…*

*हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,*

*इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….*

*गेले कुठे ते चालताना ..*
*"पॅकपॅक" आवाज करणारे ..*
*पायातले बूट?*

*"मी नाही देणार जा माझं चॉकलेट"*
*म्हणत आवळलेली ती ..*
*घट्ट मूठ….*

*किती जिव्हाळा होता ..*
*डोकं टेकवलेल्या ..*
*आईच्या हाताच्या उशीत?*
:
*ब्लँकेटहून जास्त ..*
*ऊब होती त्या ..*
*मायेच्या कुशीत…*

*हरवला तो प्रेमाचा घास….*
*"चिऊताई" दाखवत आईने भरवलेला…*

*घरात न सांगता ..*
*लपवून लपवून ..*
*खाऊ खायचा तो ..*
*प्लॅन ठरवलेला?*

*गेले कुठे जत्रेतले ते ..*
*गोड गोड म्हातारीचे केस?*

*छोट्याशा बुटांची ..*
*आईने बांधलेली ती ..*
*सुटलेली लेस….*

*गेली कुठे ती ..*
*मामाच्या गावी जाणारी ..*
*झुकझुक गाडी?*

*शाळेत बडबडगीते गाताना ..*
*एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?*

*झोपताना पाहिलेला तो ..*
*चांदोमामा कुठे हरवला?*

*अ आ इ ई ..*
*पाटीवर लिहिणारा तो ..*
*खडू कुणी पळवला?*

*कशाला आलं हे ...*
*आपल्याला शहाणपण????*

*हरवलं त्यात ते सुंदर बालपण..*
*खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?*

*आयुष्यातील काही ...*
*अनमोल क्षणांची आठवण ...*
*ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते...*

*पण बालपणीच्या काही ..*
*आठवणी,*
*मनाच्या कोपऱ्यात ..*
*अजूनही दाटलेल्या असतात,*

*त्यांना हलकेच गोंजारलं असता ..*
*त्यांची सय अधिकच गडद होते...*

*आपलं मनही किती विचित्र असतं ना...*

*जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं...*

*शाळा सोडून बाबांसारखं ...कामावर जावंसं वाटतं...*

*मात्र आता मोठं झाल्यावर ...*
*पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..*
*आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..*

*आय मिस माय चाइल्डहूड यार*
*कोई लौटा दे मुझे...*
*बीते हुए दिन..*

*चला मन थोडे हलके झाले ..*

-Suhas


Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...