Skip to main content

वृद्ध आई वडिल


वृद्ध आई वडिलांना सारखा फोन कशासाठी करायचा ? 

बाबा मला दर एक दोन दिवसाआड रात्री आठ साडेआठला फोन करतात. मी ऑफिसमधून येऊन स्वैपाकघरात असते. रात्रीचे जेवण, मागचे आवरणे, मुलाची सकाळची शाळा, त्याच्या डब्याची तयारी, दुस-या दिवशीचे ऑफिस, आमचे डबे हे सगळं ओळीने डोळ्यासमोर दिसत असतं. हातातले काम टाकून फोन घ्यायचा म्हणजे कपाळावर आठी उमटतेच. एकीकडे अपराध्यासारखंसुद्धा वाटतं. त्यांचे बोलून झाले की आईला बोलायचे असते. रोज रोज नवीन तरी काय बोलणार ? मी कानाला मोबाईल लावून, खांदा उंच करून तो पकडून एकीकडे कामे उरकत असते.
माझा दादा अमेरिकेत जाऊन तिथलाच होऊन गेला. मी ठाण्याला असते. आणि पुण्यात दोन बेडरुमच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये सत्तरी ओलांडलेले माझे आईबाबा रहातात. आईच्या भाषेत empty nesters. त्यांना सांगितले, इथे ठाण्यात फ्लॅट घ्या. पण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या आईबाबांना ते नाही पटत. (हो. मीसुद्धा पुण्याची माहेरवाशिण म्हणून तोरा मिरवतेच की.) 
आज हा विचार मनात येताच मला गंमत वाटली. ठरवले, आज सरप्राईज देऊ या. घरी आल्यावर फ्रेश होऊन बाबांना फोन लावला.
"बाबा"
"काय झालं ग ?" एकदम धसकून त्यानी विचारलं. "काही problem नाही ना ?"
" अहो कुठे काय. आज म्हटले, तुम्हाला जरा सरप्राईज देते."
"ओहो." आवाजातला आनंद आणि आश्चर्य बाबा लपवूच शकले नाहीत. माझ्या डोळ्यात पाणीच आले एकदम. मग बोललो नेहमीचेच. 
फोन ठेवल्यावर जाणवले, आपल्या म्हाता-या आईवडिलांच्या आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतात. त्यांची पिढी तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम आहे. त्यांना फक्त आपले क्षेमकुशल जाणून घ्यायचे असते. भरभरून बोलायचे असते. त्यांच्यासाठी आपण तेवढेही करू शकत नाही का ?
तिथपासून अनेकदा मी स्वतः होऊनच आईबाबांना फोन करते. त्यांचा आनंदभरला स्वर ऐकून दरवेळी पाणावणारे डोळे टिपण्यात समाधान आहे. 

-Sandesh

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...