Skip to main content

कोकण

500 रुपयात कोकणवास 🌴

५०० रुपयात तळकोकणात निसर्गाच्या कुशीत सुंदर कौलारू घरात रहायला देता, मग तुमाला परवडतं तरी कसं ?.. काही गौडबंगाल तर नाही ना ? असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे... याचे उत्तर असे की...
(1) आम्ही केवळ पैशासाठी हे सुरू केलेले नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरात फ्लॅट मध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना निसर्गाच्या 🌴🌴 सानिध्यात चार क्षण समाधानाने माणि शांततेने जगता यावेत, स्वछ निर्मळ हवेत श्वास घेता यावा यासाठी.
(2) कोकणातले बरेचसे लोक मुंबईत नोकऱ्या करतात. त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराला गावी तसेच गोव्यात फिरायला आणायचे असते परंतू गावी पाहुणचार करायचे वांदे होतात. मग आलेल्या मित्रांना हॉटेल मध्ये तरी कसं ठेवणार? गावाचा फील नको का यायला?.. म्हणूनच आम्ही आहोत अस्सल कोकणी पाहुणचारासाठी.
(3) गोवा फिरायला आलेल्या पर्यटकांना महागड्या हॉटेल मध्ये केवळ राहण्या-जेवण्यासाठी हजारो रुपये लागतात.. म्हणूनच आम्ही अगदी स्वस्तात गोव्यापासून अगदी एक तासावरच तुमची रहायची सोय करतोय आणि अगदी स्वस्तात चवदार मालवणी जेवणाची व्यवस्थाही...
या मागचा आमचा स्वार्थ हाच आहे की गोवा फिरायला आलेले पर्यटक पृथ्वीवरचा स्वर्ग अर्थातच आपले तळकोकण पाहतील... पर्यटन वाढेल... कोकण पर्यटनाला अजून अच्छे दिन येतील...

500 रुपयात काय मिळणार?
1) रहायला कोकणी संस्कृतीचा परीचय देणारे सुंदर कौलारू घर.
2) आमच्या स्थानिक लोकांसमवेत चालत गावातील सुंदर बागा, भाताची शेळ, सडा, नदीचा काठ, न्हय खोल, देवराई, जंगल सफर तसेच वनभोजन करण्याचे विलक्षण अनुभव.
3) रात्रीच्या गुलाबी थंडीत शेकोटीची ऊब.
4) झोपायला अंथरुण पांघरुण आणि आंघोळीला गरम पाणी.
5) पातीचा चहा व सकाळचा नाश्ता.

आवडीप्रमाणे घरगुती रुचकर मालवणी पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण स्वस्तात दिले जाईल .
सगळयात महत्वाचे म्हणजे तुम्हाला स्वच्छंदी फिरण्यापासून आणि आनंद घेण्यापासून कोणीही रोकणार नाही .
एकदा जरुर भेट द्या... पुन्हा नक्की याल.

🙏🙏 येवा कोकण आपलाच आसा🙏🙏
पत्ता :- श्री दत्तगुरु सामंत
मु. दुतोंड, गाव - परुळे
ता - वेंगुर्ले, जिल्हा - सिंधुदूर्ग.
मो.नं.-9637081982/9869355204

*कोकणात येतास फिराक मग काळजी करू नको ! काय ?*
कुडाळ रेल्वे स्टेशन पासून पीक-अप ड्राॅप ची सोय केली जाईल.
मुंबई गोवा हायवे (कुडाळ) पासून अवघ्या 22km अंतरावर आणि नियोजित चिपी विमानतळापासून अगदी 5 मिनीटावर. परुळे दुतोंड येथे रहाण्याची व मालवणी पद्धतीने जेवणाची उत्तम सोय !! (भारतीय बैठक)
**आता लांबचा प्रवास अगदी कमी वेळात, परुळे तेरावळे येथे त्सुनामी आयलंडवर. या बेटावर आमच्या कडून चालत 10 मिनिटे. वॉटर स्पोर्ट्स् ची मजाच वेगळी. या ठिकाणी बनाना राईड, जेट स्की राईड, बंपर राईड, कयाक राईड, यासारख्या राईड्सची मजा घेऊ शकता. **बोटिंग मध्ये डॉल्फिन सफर, संगम पॉइंट, भोगवे बीच, फक्त 2.5 कि.मीटर
देवबाग बीच, होडीने 1 कि.मीटर
किल्ले निवती बीच, 4 कि.मीटर
तारकर्ली बीच 8 कि.मीटर
सिंधुदुर्ग किल्ला, 12 कि.मीटर चा अनुभव घ्या.
खोल समुद्रात ऊंच फुग्यात बसून पॅरासेलींगचा आनंदच वेगळा. समुद्रातील वेगळ्या जगाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. **ओहटीच्या वेळी वाळूत किल्ले बनविणे. सीगल पक्षांचे पाहणे अन मालवणी डोस्याची चवच वेगळी.
**दुपारी मालवणी जेवण करून अन् सोलकडी पिऊन ढेकर देण्याची मजाच वेगळी.
**संध्याकाळी निवांत पाण्यावर कयाक राईड (रीव्हर राफ्टिंग), मावळत्या सूर्याची किरणं अंगावर घेणं. पाण्यात गळ टाकून मासेही पकडता येतात..
*मग येताय ना ?*
!!श्री समर्थ कॅटरर्स !!
संपर्क दत्तगुरु सामंत - 9637081982
सौ. अर्चना देसाई (कणकवली) 9420150709 
भाऊ परुळेकर (कुडाळ) 9422374421
!! धन्यवाद !!

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...