Skip to main content

इंद्रधनुषी हमिंगबर्ड

*निसर्गातला हा चमत्कार टिपण्यासाठी तो १९ वर्षे अडून राहिला...*

जगातला आकाराने सर्वात लहान पक्षी हा बहुमान 'हमिंगबर्ड' म्हणजेच 'गुंजन' पक्ष्याला मिळाला आहे.  सकाळच्या प्रहरी याच दिसणं म्हणजे दिवस शुभ जाण्याचा संकेत असतो असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं! फक्त  ३ ते ४ इंचाच्या या टीचभर आकाराच्या पक्ष्याला निसर्गाने एक वेगळंच देणं दिलं आहे आणि ते म्हणजे या हमिंगबर्डच्या पंखांतून जेव्हा सूर्यप्रकाश  जातो, तेव्हा त्याचे पंख अद्भुत अशा इंद्रधनुषी सप्तरंगांनी झळाळून उठतात.  या दुर्मिळ आणि अद्भुत प्रसंगाचं चित्रण करण्यासाठी एका फोटोग्राफरने थोडी-थोडकी नव्हे, तर आपल्या आयुष्यातली तब्बल १९ वर्षें खर्ची घातली आहेत. त्या फोटोग्राफरचं नाव आहे ख्रिस्तीयन स्पेन्सर!!

हमिंगबर्ड जरी दिसायला लहान असला तरी तो ताशी जवळपास ५४ किलोमीटरच्या वेगाने उडू शकतो! एवढंच नाही, तर एका सेकंदात आपले पंख ८० वेळा फडफडवू  शकतो. पण त्याच्या पंखातून इंद्रधनुष्यी आविष्कार टिपण्यासाठी तो सूर्याच्या समोर असणेसुद्धा आवश्यक आहे. यावरून तुम्हाला ख्रिस्तीयनची कामगिरी किती कठीण असेल याचा अंदाज येईल!

हा फोटो काढण्यासाठी हा ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर तब्बल १९ वर्षे ब्राझिललच्या इटाटिया नॅशनल पार्कमध्ये ठाण मांडून बसला होता. त्याच्या या कामगिरीने मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारले असून सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे! या फोटोग्राफीसाठी त्याला २०११ सालीच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय!! हमिंगबर्डच्या या विलोभनीय दृष्यांचा ख्रिस्तियनने एक सुंदर व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडिओ "The dance of time" या नावाने तो यूट्यूबवर उपलब्ध आहे.

प्राणिजगतातून आपल्याला अशा अनेक अद्भुत आणि विस्मयकारी घटनांचं दर्शन होऊ शकतं. फक्त त्यासाठी त्यांच्याबद्दल प्रेम आणि संयम ठेवून त्यांचा अभ्यास करायला हवा!! खुद्द प्राणीजगत हाच एक चेतनेचा अद्भुत आविष्कार आहे! आणि या घटना ही दृष्ये आपल्याला जाणीव करून देतात की आपल्याला अजून बरंच काही शोधायचं आहे. अजून आपल्याला बरंच काही पाहाणं आणि अनुभवणं बाकी आहे!

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...