Skip to main content

पंतप्रधानांकडून शुभेच्छा

[8/13, 20:20] आपली मा.वि. अरुंधती वाकडे.
सौ. अरुंधती प्रविण दीक्षित.
आवर्जून वाचा. 

सुहृदहो,
😊☺️😄😇
काल प्रवीण दीक्षितांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पूर लोटला. ज्यांना त्यांचा फोन नंबर वा मेलचा पत्ता माहित नव्हता त्यांनी माझ्याकडे हा शुभेच्छांचा ओघ वळवला. सरकारी अधिकारी खुर्चीवरून उतरला की तो विस्मृतीच्या टोपलीत नकळत सरकवला जातो. त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी तर नक्कीच. पण तसे झाले नाही. अनेक सुंदर सुंदर कविता लोकांनी आपणहून करून पाठविल्या; कोणी श्लोक, कोणी सुंदर पत्रे लिहीली. कोणी त्यांच्या आठवणी, कोणी फोटो. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी दिवस सुंदर झाला.

                अनपेक्षित आलेला एक शुभेच्छा संदेश खूप खूप मोहरवून गेला. मोहवून गेला. तो संदेश होता पंतप्रधान नरेद्र मोदीजींकडून आलेला.  वाढदिवसाच्या शुभेच्छांचा. त्यांच्या अक्षरात, त्यांच्या सहीचा. डाव्या बाजूला अमृतसरच्या सुवर्णमंदिराची प्रतिमा तर उजवीकडे मोदीजींचा फोटो आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश! परत परत पाहतांना किती आनंद झाला म्हणून सांगू? एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात प्रत्येक माणसाशी असं संगणकाच्या सहाय्याने का होईना आपलेपणा निर्माण करणे ही किती मोठी गोष्ट.  आत्तापर्यंत आम्हाला इतक्या आपुलकीची सवयच नव्हती. आत्तापर्यंत पंतप्रधान कधी जवळचे वाटलेच नव्हते. लोकांमधून आलेले, भारताच्या मातीतून उभे राहिलेले. लोकांचेच वाटणारे हे पंतप्रधान फक्त नरेंद्र मोदीच!

              काही वर्षांपूर्वी त्यांनी गुजरातच्या कच्छ भागतील छोटा रण येथे टेंट सिटी मधे भारतातील सर्व राज्यांच्या पोलीस प्रमुखांची कॉन्फरन्स घेतली होती. तेथे त्यांनी सर्व प्रमुखांच्या पत्नींनांही आवर्जून निमंत्रित केले होते. ते न विसरणारे तीन दिवस मला आठवले. पंतप्रधान एखाद्या घरातील मुख्यासारखे आमच्याशी वागत होते. किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होते. अत्यंत  शिस्तीत वागायला लावून आमचा पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत वेळ आम्हाला वाया घालवू देत नव्हते.

ते कच्छचे रण पार वेगळेच होते. सर्वत्र मिठाची जमीन तयार झाली होती. हिवाळ्यात अत्यंत कडाक्याच्या थंडीत हिमालयात नद्यांवर जसं बर्फ जमून त्याचा पक्का रस्ता तयार होतो तसे येथे समुद्राच्या पाण्यावर मिठाचे बर्फीसारखे घट्ट थर तयार होतात. त्यावरून चालता येते.  आमच्यापैकी कोणी त्यावरून पुढे चालत जायला लागल्यावर स्वतः पंतप्रधान हाका मारून मागे बोलवत. ``तेथे पुढे जाऊ नका. मिठाचा थर जर पक्का नसेल तर समुद्रात पडाल.’’ म्हणून मोठ्या काळजीने सांगत. एकदा सर्व स्त्रीवर्गाने आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं आहे असा हट्टच धरल्यावर ते  सहज तयार झाले. वेळात वेळ काढून आम्हाला 15 मिनिटे भेटले.  आम्हालाच त्यांच्याबरोब काय बोलावं हे सुचेना. ``कसं वाटलं तुम्हाला कच्छचं रण? पूर्वी कधी येथे आला होता का?’’ तेथील घरं कशी विशेष बनवली आहेत; ती कुठल्याही भूकंपाला तोंड देऊ शकतात; तेथल्या रणात राहणार्‍या महिला हाताने उचलताही येणार नाहीत असे नखापेक्षाही अगदि छोटे छोटे आरसे वापरून कशा भरतकाम करतात, तेथे एरंड आणि बाभळीशिवाय काहीच उगवत नाही त्यामुळे ह्या स्त्रियाच्याही भरतकामात बाभळीच्या काट्यांची नक्षी ही असतेच ती बघायला विसरू नका; तेथे एक मुसलमान कारागीर एरंडाच्या तेलात बाभळीचा काटा बुडवून सुंदर चित्र काढतो ते नक्की बघा. ------ एक ना दोन कित्ती माहिती त्या थोड्या वेळात आम्हाला मिळाली. तेथे राहणारा जणु प्रत्येक माणूस त्यांच्या माहितीचा होता. नंतर कळले की खरोखरच मोदीजी ह्या सामान्य माणसांच्या घरी अनेकवेळा राहून गेले आहेत. अत्यंत कामात असलेला हा देशप्रमुख तडफेने कामं करतांना, तळमळीने बोलतांना, आपणहून आम्ही काय बघावं ही माहिती देतांना पाहून धन्य वाटलं होतं.

आम्ही गेलो होतो तेंव्हा पौर्णिमेच्या जवळपासचे दिवस होते. प्रत्येक ऑफिसरच्या कामाचा अत्यंत कडकपणे लेखाजोखा मागणार्‍या ह्या अत्यंत शिस्तप्रिय देशाच्या मुख्याने सहजपणे प्रवीणला विचारलं, तुम्ही चंद्राच्या प्रकाशात रात्री हे रण किती सुंदर दिसते हे पाहिलं का? नसेल तर रात्री पत्नीला बरोबर घेऊन दोघेजण पाहून या. मुद्दाम आम्ही दोघेही त्या शांत रात्री चंद्रप्रकाशात उजळून निघालेलं ते लवणधवल रण पाहून स्तिमित झालो. परत येत असतांना जेथे एक झुडुपही उगवायचा संभव नाही, जेथे प्यायला पाणी मिळणेही अवघड अशा जागी BSF च्या जवानांचा तंबू पाहून प्रवीणने त्यांची चौकशी केली. अशा भयाण एकाकी जागी  भारताच्या सीमेची राखण करत महिनोन्महिने राहणार्‍या त्या जवानांना पाहून मनात एक विचार आला,-- आपल्याला पंतप्रधानांनी नक्की कशासाठी पाठवलं असावं? निसर्ग शोभा बघायला का आमच्याच पोलीस जवानांचा दिनक्रम किती कठीण असतो हे जाणवून द्यायला? येताना आमच्या बृहद्परिवाराच्या आठवणी मनात कोरल्या गेल्या. पंतप्रधान मोदीजींनी सहजपणे आमचे पाय जमिनीवर ठेवले.

                     त्या तीन दिवसात आम्ही त्यांची प्रत्येक भाषणं ऐकण्यासाठी तळमळत होतो. कल्पनांचा, नवनवीन विचारांचा  अखंड धबधबा  असे त्याचं भाषण म्हणजे. पोलीसांनी समाजाभिमुख व्हावं म्हणून किती बारीक बारीक सुंदर सूचना असत. फक्त अधिकार्‍यांसाठी असलेली त्यांची काही भाषणे आम्ही बंद दाराच्या बाहेर उभं राहून ऐकत असू. मोदीजींच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आपणहून दरवाजे उघडून आम्हाला आत बसून त्यांचे भाषण ऐकण्याची परवानगी दिली.

                      आपापल्या विभागात राहणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधे बोलवून एक फूल देऊन त्यांचा सत्कार करा.  आपल्या विभागात जे सैन्याचे शहीद झालेले जे वीर असतील त्यांच्या हौतात्म्यदिनी ते ज्या शाळेत शिकले असतील त्या शाळांमधे एक कार्यक्रम करून त्यांच्या बलिदानाची माहिती देणार्‍या गोष्टी विद्यार्थ्यांना  सांगायला सांगा.  ---  किती किती  सांगू.

                       प्रवीणची पोस्टिंग मॉरिशसला असतांना तेथील एका गोष्टीचे आम्हाला कायम अप्रूप वाटे. तेथे खूप लोक दीर्घायुषी होते. ज्यांना 100 वर्षे पूर्ण होत त्यांच्या घरी पंतप्रधान स्वतः जाऊन त्या वयोवृद्धाचा सत्कार करीत. त्यावेळेला वाटे की असं काहीतरी भारतात असावं. आज वाटलं, शंभराव्या वर्षी त्या वृद्ध व्यक्तीला त्या सत्काराची जाणीव तरी होत असेल का नाही कोण जाणे त्यापेक्षा ऐन उमेदीत असतांना पंतप्रधानांकडून अशा शुभेच्छा आल्या तर त्याचा जास्त आनंद वाटू शकतो. आणि आपण तो आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत साजरा करू शकतो. पंतप्रधानांनी ह्या शुभेच्छा ट्विट करा, शेअर करा, पाठवा, व्हॉटसॅप करा असे अनेक पर्याय देऊन सर्वांना टेकसॅव्ही करून टाकलं आहे.
🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾
-----------------------------
लेखणी अरुंधतीची -
पूर्वाश्रमीची अरुंधती वाकडे, आता सौ प्रवीण दीक्षित
(माजी विद्यार्थिनी हुजूरपागा)


[8/13, 21:00] Madan Kalwit: 👌👌👌
प्रवीण दीक्षित नागपूरचे पोलीस कमिशनर होते. या अरुंधती त्यांच्या सुविद्य पत्नी. संस्कृत अभ्यासक आणि प्रेमी. त्यांनी पुष्कळश्या स्तोत्रांचे मराठी भाषांतर केले आहे. महागणेशपंचरत्न स्तोत्राचे भाषांतर पेपर मध्ये वाचून मी त्यांच्या दिलेल्या मोबाईलवर फोन केला , अभिनंदन केले, काय करता विचारले - मी गृहिणी आहे असे म्हणाल्या, कुठे राहणं विचारल्यावर - सिविल लाईन्स, मी म्हटलं नक्की कुठे मॅडम कारण भेटायचं असेल तर मला पण ऑफिस मधून सोयीचं होईल, मी पण संस्कृत प्रेमी आहे, तेंव्हा म्हणाल्या - पोलीस कमिशनर बंगला, मग माझी ट्यूब पेटली.  त्यांच्या घरी तर गेलो नाही पण एका कार्यक्रमात भेटलो. अतिशय सज्जन, हुशार आणि सिम्पल वव्यक्तित्व .

Comments

  1. Admirable PM. Admirable writing by Smt. Arundhati. All good wishes to Shri Pravin Dixit.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...