Skip to main content

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती

पंढरपूरची_भोपळ्याची_शेती
         सतार व तंबो‍ऱ्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे भोपळे लागतात.‘ही दोन्ही वाद्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा भोपळा दर्जेदार असतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात भीमा, चंद्रभागेच्या तीरावरच्या वाळवंटी जमिनीत पिकवले जातात. हे भोपळे चवीला अत्यंत कडू असतात. नदीच्या काठावर काही मोजक्या गावांमध्ये या भोपळ्याचे पीक घेतले जाते. तेथील विशिष्ट हवामान, माती यामुळे हे भोपळे वजनाने हलके आणि बाहेरून टणक तयार होतात. त्यामुळे त्यातून मधुर सूर निर्माण होतो.
        भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची पैदास होते. 
        शेतकरी साधारण श्रावणात किंवा दसरा झाल्यानंतर आपल्या शेतात भोपळ्याच्या बियांची लागवड करतात. हे भोपळे खासकरून वाद्य तयार करण्यासाठीच पिकविले जातात. याची पूर्ण वाढ होण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा काळ जातो. या कालावधीत मिरजेतले सतार बनवणारे व्यावसायिक पंढरपूर, सोलापूरला जाऊन भोपळ्याची खरेदी करून, ते तिथेच वाळण्यासाठी ठेवतात. हा भोपळा वेलीवरच वाळलेला चांगला.
       शेतकरी याची विशेष काळजी घेतात जेणेकरून यांचा आकार बिघडता कामा नये. मार्च महिन्यात वाढ पूर्ण होताच हे भोपळे देठापासून कापून शेतातच वाळविण्यासाठी ठेवले जातात. पंढरपूरच्या उष्णतेत होरपळून निघालेले अद्वितीय असे हे भोपळे न आक्रसता आपला आकार तसूभरही बदलत नाहीत. ही पंढरपूर भागातल्या भोपळ्यांची खासियतच म्हणावी लागेल. हे भोपळे पूर्णपणे सुकल्यानंतर ते विक्रीसाठी ठेवले जातात आणि त्यांना चांगला भावही मिळतो.
        वेलीवर चार-पाच भोपळे लागले की शेतकरी ती वेल खुडून, वेलीची वाढ थांबवतात. त्यामुळे वेलीला तोवर लागलेले भोपळे चांगले पोसले जातात आणि त्यांचा आकार मोठा होतो. हा भोपळा चवीला कडू असतो. त्यामुळे माणसं किंवा जनावरं तो खात नाहीत. भोपळ्याचा देठ चांगला वाळला की तो तोडला जातो. साधारण मेपर्यंत भोपळा कडक उन्हामध्ये चांगला वाळला की व्यापारी टेंपोत भरून तो मिरजेला घेऊन येतात. मिरजेत दाखल झाल्यानंतर व्यापारी त्यांना पोटमाळ्यावर टांगून ठेवतात. पुढची किमान ५० वर्षं या भोपळ्यांना काहीही होत नाही. पोटमाळ्यावर ठेवण्यापूर्वी खोलीच्या छताखाली ते कोणती जागा पटकावणार हे त्या भोपळ्याचा घेरच ठरवितो. त्यावर त्याची शाईने तशी नोंद केली जाते. जेव्हा सतार किंवा तंबोरा तयार करण्याची ऑर्डर मिळते त्यावेळी प्रत्येकाच्या सोयीनुसारच तो तयार केला जातो, मग तो वापरणारा पुरूष किंवा स्त्री कोणीही असो, त्याला जो योग्य, सोयीचा वाटेल तोच भोपळा त्याच्यासाठी निवडला जातो. पुरुषांसाठी असणा-या भोपळ्याचा आकार तुलनेने मोठा असतो. चांगल्या वाळलेल्या भोपळ्याला कीड लागत नाही व तो वजनानेही हलका होतो. भोपळा ओला असेल तर कालांतरानं तो किडू शकतो आणि आकसतो. त्यामुळे वाद्य बनवताना अडचण येते. भोपळा दुकानात दाखल झाल्यापासून वापरात येईपर्यंत आणखी दोन-चार वर्षं निघून जातात. एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर भोपळ्यांची किंमत भरमसाठ वाढते. मिरजेला दरवर्षी विविध आकाराच्या साधारण दोन हजार भोपळ्यांची आयात होते. हा पुरवठा करून जर भोपळा शिल्लक राहिला तर तो कलकत्त्याला पाठवला जातो. मिरजेशिवाय ही वाद्यं कलकत्ता आणि लखनौलाही बनतात. 

अशी बनते #सतार व #तंबोरा 
        भोपळा देठाच्या बाजूने गोलाकार कापून आतल्या सर्व बाजूंनी साफ केला जातो. त्यानंतर भोपळ्याच्या आतली त्वचा मऊ व्हावी म्हणून त्यात पाणी भरले जाते आणि तो पाण्याने भरलेला भोपळा दोन दिवस त्याच स्थितीत ठेवला जातो. दोन दिवसांनी त्यातील पाणी आणि गर काढून टाकाला जातो. त्यानंतर, त्यात उभ्या आडव्या दिशेने लाकडी काठ्या घट्ट बसविण्यात येतात जेणेकरून त्याला दिलेला आकार हा ‘समाकार’ रहावा हा त्यामागील उद्देश असतो. त्याचवेळी त्याच्या गोलाकार भागाभोवती ‘तून’ किंवा ‘टून’चे लाकूड वापरून त्यापासून त्याचा गळा तयार केला जातो.
शेवटी लाखेचा वापर करून त्या गळ्यावर दांडी बसविली जाते. त्यानंतर भोपळ्यावर लाकडाची एक तबकडी बसविली जाते जेणेकरून भोपळा बंद होतो. यापुढे त्यावर कलाकुसर केली जाते. त्यानंतर चार पाच वेळा पॉलिशचे हात दिले जातात. हे करत असतानाच या वाद्याचा रंग ठरविला जातो. शेवटी त्यावर खुंट्या, तारा आणि वाद्या बसवून हे वाद्य सूर जुळवून वाजविण्यासाठी सज्ज होते. अशा त-हेने सतार किंवा तंबो-याचा जन्म होतो.
       या भोपळ्या बरोबरच लाकूडही आवश्यक असते. पुर्वी हे लाकूड गंध देवदार जातीचं असायच. हे लाकूड वजनाला हलकं व लाल रंगाचं असतं. हे कर्नाटकातील सकलेशपूर जंगलातून येतं. पूर्वी सागवान सुध्दा वापरले जायचे, पण आज तेही महागल्याने ‘तून’ नावाच्या लाकडाचा वापर केला जातो. भोपळा व लाकूड यांचा पोकळ लाकडी साचा बनवून त्यावर नक्षीकाम केले जाते. वाद्यांवरती जे नक्षीकाम केलं जातं त्यासाठी पूर्वी हस्तीदंत, सांबरशिंगाचा वापर केला जायचा. पर्यावरण कायद्यातील अटी कडक झाल्यामुळे आजकाल या प्रकारचा माल वापरला जात नाही. त्याजागी सिंथेटीक मालाचा वापर केला जातो. लाकडाचीही आवक कमी झालीय.
        संगीत वाद्यांपैकी तंतुवाद्यांसाठी प्रसिद्ध असणारे मिरज हे सांगली जवळचे कृष्णाकाठावरचे संगीताची मोठी परंपरा सांभाळणारे शहर. किराणाघराण्याचे जनक अब्दुलकरीम खाँ साहेब यांची कर्मभूमी असणारी ही नगरी. विष्णु दिगंबर पलुसकर, विनायक बुवा पटवर्धन, भानुदास बुवा गुरव, वसंत पवार, राम कदम अशी वैभवशाली संगीत परंपरा असणा‍ऱ्या या गावात संगीतातील तंतुवाद्य निर्मितीची ही मोठीपरंपरा आहे.
        आदिलशाहीत विजापूरच्या बादशहाने अनेक कारागिरांना मिरज येथे पाठवून दिले. त्यापैकी शिकलगार कुटुंबीय मिरजेत स्थायिक झाले. त्यांचा मूळव्यवसाय भाला, बरची, तलवार अशी शस्त्रे बनविण्याचा. कालांतराने लढाया कमी झाल्याने शस्त्रांची मागणी कमी झाली आणि चरितार्था साठी इतर व्यवसायांकडे वळावे लागले. त्यात या कुटुंबातील मोहद्दीन साहेब व फरीद साहेब यांना संगीताची उत्तम जाण होती. मिरजेचे सरकार पटवर्धन यांना ही संगीताची आवड आणि आस्था होती. त्यांनी मोहद्दीन साहेब व फरीद साहेब यांना गणेश कलागृहात पाचारण करून तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. फरीद साहेब यांनी आपली कल्पकता पणाला लावून भोपळा, लाकूड आणि तारांनी बनविलेल्या तंतुवाद्यात ध्वनिलहरीतील सप्तक जखडून ठेवले आणि पहिल्या वहिल्या तंबो‍ऱ्याची निर्मिती झाली.

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...