Skip to main content

कविता कि कथा - खूपच तरल

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची..

एंक खूप छान कथा.....

कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.

ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......

पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...

'मी माझ्या लेकीला
ओळखतो .....

तसा तुलाही.. ...

सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...

अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा......

पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर?

तसं व्हायला नको...

म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......

कधी वाटलं तर
येऊन बसत जा.....

"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"

भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात......

विचारांवर ठाम झालास
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...

निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे. .....

नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा......'

आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......

कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात

अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं... ...

मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ..   ..

याची त्याला
कल्पनाच नव्हती...

एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्‍याने
फडफडत होतं ....

त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...

त्याने जवळ जाऊन
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...

कसली बीलं
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...

सिलेंडर संपल्याची तारीख,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...

इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..

अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...

तारीख पुढे गेलीतर....

त्याला गलबलूनच आलं ....

या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो.. ...

ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......

तक्रार करत राहिलो.....

त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....

तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली .....

खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......

वाळून वाळून
झूरायला आलेली ....

तिला भिजवयला
तो आतूर झाला,......

कातर झाला...

पाणी घालायला
भांड नव्हतं .......

त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....

तहानलेली शेवंती

गटा गटा पाणी प्यायली.. ....
आणि तोच तृप्त झाला......

तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला .......

ती आली होती......

शेवंतीसारखीच... .....

तिला समोर बघून
तो उनमळून गेला... ...

काय अवस्था
करून घेतली
आहे हिने... ....

हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....

की आपण लक्षात
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....

दोघांची नजरा नजर झाली...

दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....

ती म्हणाली,

"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "

तो गलबलून म्हणाला,

"आत्ताच पाणी दिलय... ...

तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना......"

आणि ती थांबली......

..अगदी...   कायमची...!!!

पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....

परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो....

त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....

त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....

आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......

हेच खरं "प्रेम" असतं.....

हेच खरं "प्रेम" असतं.....

नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....

कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......

तर आयुष्यभर
एकटे राहाल......

विश्वास उडाला
की आशा संपते......

आणि काळजी घेण
सोडल की प्रेम......

म्हणुन, विश्वास ठेवा,....

आणि काळजी घ्या.......

आयुष्य खुप सुन्दर आहे........

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...