Skip to main content

कविता कि कथा - खूपच तरल

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची..

एंक खूप छान कथा.....

कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.

ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......

पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...

'मी माझ्या लेकीला
ओळखतो .....

तसा तुलाही.. ...

सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...

अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा......

पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर?

तसं व्हायला नको...

म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......

कधी वाटलं तर
येऊन बसत जा.....

"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"

भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात......

विचारांवर ठाम झालास
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...

निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे. .....

नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा......'

आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......

कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात

अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं... ...

मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ..   ..

याची त्याला
कल्पनाच नव्हती...

एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्‍याने
फडफडत होतं ....

त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...

त्याने जवळ जाऊन
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...

कसली बीलं
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...

सिलेंडर संपल्याची तारीख,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...

इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..

अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...

तारीख पुढे गेलीतर....

त्याला गलबलूनच आलं ....

या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो.. ...

ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......

तक्रार करत राहिलो.....

त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....

तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली .....

खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......

वाळून वाळून
झूरायला आलेली ....

तिला भिजवयला
तो आतूर झाला,......

कातर झाला...

पाणी घालायला
भांड नव्हतं .......

त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....

तहानलेली शेवंती

गटा गटा पाणी प्यायली.. ....
आणि तोच तृप्त झाला......

तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला .......

ती आली होती......

शेवंतीसारखीच... .....

तिला समोर बघून
तो उनमळून गेला... ...

काय अवस्था
करून घेतली
आहे हिने... ....

हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....

की आपण लक्षात
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....

दोघांची नजरा नजर झाली...

दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....

ती म्हणाली,

"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "

तो गलबलून म्हणाला,

"आत्ताच पाणी दिलय... ...

तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना......"

आणि ती थांबली......

..अगदी...   कायमची...!!!

पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....

परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो....

त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....

त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....

आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......

हेच खरं "प्रेम" असतं.....

हेच खरं "प्रेम" असतं.....

नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....

कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......

तर आयुष्यभर
एकटे राहाल......

विश्वास उडाला
की आशा संपते......

आणि काळजी घेण
सोडल की प्रेम......

म्हणुन, विश्वास ठेवा,....

आणि काळजी घ्या.......

आयुष्य खुप सुन्दर आहे........

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ