Skip to main content

Marathi Language Day...

26/02/17, 5:47 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
27/02/17, 12:47 AM - Mohan jagdale: ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे.
या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.
त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, ल व ळ च्या मधला करतात. तर काही वेळेस ल करतात.

ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.
पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.
भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृत मधे सध्या ळ नाही.
हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही.

सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही.

मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे.

ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणा मुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित.
हिंदीत कमल व मराठीत कमळ
ल काय , ळ काय..
काय फरक पडला?

पण कसे मराठीत होत नाही.
ल की ळ यावरून अर्थात फरक पडतो.
काही शब्द पाहू.

अंमल - राजवट
अंमळ - थोडा वेळ

वेळ time
वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा
खल बत्ता मधील खल
खळ- गोंद

पाळ - कानाची पाळ
पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी
नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल - निवडणूकीचा कल, झुकाव
कळ - वेदना,पोटातील कळ
किंवा यंत्राचे बटण

लाल - लाल रंग
लाळ - थुंकी

ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा
ओळ - रेघ

मल - शौच
मळ - कानातला, त्वचेचा मळ यापासून गणपती झाला.

माल - सामान
माळ - मण्यांची माळ, हार

चाल - चालण्याची ढब
त्याची चाल ऐटदार आहे वगैरे
चाळ - नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना
जनता दल
पुरोगामी लोकशाही दल
दळ - भाजी अथवा फळाचा गर
वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट
छळ - त्रास

काल - yesterday
काळ - कालखंड वगैरे, मृत्यु

गलका - ओरडा आरडा
गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

तरी आपली भाषा जपा
इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.
खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,
हिंदीत.खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते
खाली होत नाही.

नाहीतर ल किंवा तपमान प्रमाणे
ळ ऐवजी व वापरा असा सरकारी फतवा येईल.

ळ जपा
मराठीचे सौंदर्य जपा
27/02/17, 2:03 AM - Ravindra Chandorkar: *आज २७ फेब्रुवारी*
*आज "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला', असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य मा.कुसुमाग्रजांची जयंती.*
जन्म २७ फेब्रुवारी १९१२
मा.वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नव असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. मा.वि.वा.शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. 'काढ सखे गळ्यातले' सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि'जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती' हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, 'गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने 'क्रांतिकवी'. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले. कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. 'गर्जा जयजयकार' सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी 'काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात' सारखी कविताही लिहिली. 'नटसम्राट'मधून नाटय़रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि 'कल्पनेच्या तीरावर' सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले. *मा.कुसुमाग्रज* यांचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले.
27/02/17, 2:50 AM - Revati Deshpande Sapre: खरचं, मराठी भाषा अतिशय sensitive आहे.. नुसते अ क्षर बदलूनच नाहीतर काना, मात्रा, वेलांटी, उकार बदलले की शब्दाचा अर्थ बदलतो आणि ते सारे खूप मनोरंजक असते... उदा... मन, मान, मीन, मौन, बट, बूट, बेट, बीट, इ..
मराठी दिनाच्या दिवशी सुंदर लेख वाचायला मिळाला.. मोहन j.. हे तु झे लेखन आहे का?
By the way... Whats app वर अनेक उत्तमोत्तम लेख व कविता सादर करणाऱ्या अनेक unknown लेखकांना व कविंना 🙏🙏🙏
27/02/17, 2:51 AM - Revati Deshpande Sapre: ५२ बोली भाषांतून तयार झालेली, २००० वर्षांचा इतिहास असलेली, अमृताशीही पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा..... आणखी समृद्ध आणि प्रगल्भ होत रहावी...!! जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!
27/02/17, 2:57 AM - Sunil Malode SHS: Harivansh Rai Bachhan's poem on friendship: .....

मै यादों का
किस्सा खोलूँ तो,
कुछ दोस्त बहुत
याद आते हैं....

...मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त
बहुत याद आते हैं....

.....अब जाने कौन सी नगरी में,
आबाद हैं जाकर मुद्दत से....

....मै देर रात तक जागूँ तो ,
कुछ दोस्त
बहुत याद आते हैं....

....कुछ बातें थीं फूलों जैसी,
....कुछ लहजे खुशबू जैसे थे,
....मै शहर-ए-चमन में टहलूँ तो,
....कुछ दोस्त बहुत याद आते हैं.

....सबकी जिंदगी बदल गयी,
....एक नए सिरे में ढल गयी,

....किसी को नौकरी से फुरसत नही...
....किसी को दोस्तों की जरुरत नही....

....सारे यार गुम हो गये हैं...
.... "तू" से "तुम" और "आप" हो गये है....

....मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त बहुत याद आते हैं....

...धीरे धीरे उम्र कट जाती है...
...जीवन यादों की पुस्तक बन जाती है,
...कभी किसी की याद बहुत तड़पाती है...
और कभी यादों के सहारे ज़िन्दगी कट जाती है ...

.....किनारो पे सागर के खजाने नहीं आते,
....फिर जीवन में दोस्त पुराने नहीं आते...

.....जी लो इन पलों को हस के दोस्त,
फिर लौट के दोस्ती के जमाने नहीं आते ....👍

......हरिवंशराय बच्चन
27/02/17, 3:13 AM - Sucheta SHS: एक होतं गाव.
"महाराष्ट्र" त्याचं नाव.

गाव खूप छान 👌होतं,
लोक खूप चांगले👌 होते.

"मराठी" भाषा बोलत होते,

गुण्यागोविंदानं नांदत होते.
त्यांचं मन ❤ खूप मोठ्ठं होतं.
वृत्ती खूप दयाळू होती.

दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून 🏃🏻🏃🏻जायचे.
आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ
देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,

महाराष्ट्रात होता एक भाग.
"मुंबई" त्याचं नाव.

मुंबईसुद्धा छान 👌होती;
महाराष्ट्राची शान होती.

सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.
आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.

इथं आले, की इथलेच होऊन
राहत होते.

"अतिथी देवो भव...!" 👏

या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.
पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू
लागली. "अतिथी"
जास्त आणि "यजमान" कमी झाले.

मुंबई 🏢🏩🏨🏬 कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.

मराठी आपली वाटत नव्हती.

प्रश्न ?मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

त्यांना एक युक्ती सुचली.
दूरदेशीची परदेशातील
भाषा त्यांना जवळची वाटली.

त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, 🇺🇸🇦🇺 परदेशात जातील, उच्चशिक्षित 📖होतील. सर्वांचाच,अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,

आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना,
बोलीभाषा ही बदलली.

सगळ्याचा नुसता काला झाला.
शुद्ध, सुंदर मराठीचा लोप⚫ झाला.

?
?
?
?
?
?
?
?
?

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर

माफ करा हं........

आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला.

चुकून त्याचा हात एका 📖 पुस्तकावर पडलं, त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,
पानं फडफडली, आनंदित झाली.

त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

इतक्यात त्या मुलानं
विचारलं, (त्याच्या भाषेत)
"मम्मी" कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे ?''

'मम्मी' खूप सजग होती,
मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक 📖 परत जागेवर ठेवत म्हणाली, "अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस,

"मराठी भाषा" प्रचलित होती;
आता कोणी नाही ती बोलत.

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,
पानांपानांतून अश्रू ठिबकले;
पण...................

हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी 😩 होणारं काळीज❤ कोणाचंच उरलं नव्हतं.!!

महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!!!

मला एकानी विचारले तू मराठीत का 'पोस्ट' टाकतो....??? आणि,
मी त्यांना एवढंच म्हटलं,

आमच्या घरात "तुळस"🌿आहे,
'Money plant'🎍नाही.

आमच्या घरच्या स्त्रीया 👵🏼 "मंदीरात" जातात,
'PUB' मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या 👏 पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.

आम्ही "मराठी" आहोत,
आणि मराठीच राहणार 👍!!!

तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय
मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,

अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय.

अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा...

"तुळशी" ची जागा आता
'Money Plant' ने घेतलीय...!!

"काकी" ची जागा आता 'Aunti' घेतलीय...!!!

'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत.

अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले....???

"भाऊ"👬 'Bro' झाला...!!
आणि "बहीण "👰 'Sis'...!!!

दिवसभर मुलगा "CHATTING" च करतो... नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!!

दुध पाजणारी "आई" जिवंतपणीच 'Mummy'झाली.!!

घरची "भाकर" आता कशी आवडणार हो...

५ रु. ची 'Maggi' आता किती "Yummy" झाली...!!!

माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू लागलाय....😩

आपली संस्कृती लोप⚫ पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न 👏तरी करा !!!

विनंती आहे ,,, सगळयांना पाठवा.

🌹

27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोचवा 😀😀
27/02/17, 6:22 AM - Arvind Dhupe SHS: मला आलेली एक पोस्ट
निश्चितच विचारमग्न करणारी

दि. २६ फेब्रुवारी १९६६, भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक हिंदूंच्यासाठी जगण्यास कठीण गेलेला दिवस. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव सावरकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथी निमित्त थोडंसं जे काही वाचलंय, ऐकलंय आणि आज मी स्वतः लंडनमध्ये जे अनुभवलंय ते मांडण्याचा एक छोटा प्रयत्न. सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत

भारतात असताना सावरकरांचं साहित्य वाचण्याचा फार कमी योग आला पण इकडे लंडनला आल्यावर मी खऱ्या अर्थाने सावरकर वाचायला लागलो, समजायला लागलो आणि त्यावरून एक मात्र नक्की जाणवलं कि त्यांनी जी काही तत्त्व मांडली आहेत ती आपण आज सुद्धा अवलंबू शकतोय. मला इंग्लंडला येऊन तसे आता ५ महिने होत आले पण मनात कायम एक भीती असायची कि परका देश, सगळा शून्यातून जम बसवायचा आणि त्यात ब्रिटिश लोकांच्या मनात असलेला भारतीय लोकांबद्दलचा काहीअंशी द्वेष (जो आता फार कमी झालाय पण पूर्ण संपलेला नाही) पण मग सदैव प्रवाहाच्या विरोधात वाहणाऱ्या आणि त्या तत्त्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या अशा निर्भीड आणि धाडसी तात्यारावांकडून परक्या देशात सुद्धा धिटाईने जगण्याची जणू नवीन उमेद मिळाली असं म्हणायला हरकत नाही.

आज एवढ्या सोयीसुविधा उपलब्ध असूनसुद्धा एवढ्या अडचणी येतात इथे आणि मन खायला उठतं कधीकधी आणि परत भारतात येण्याची इच्छा होते. १९०६ साली तात्यारावांनी बॅरिस्टर करण्यासाठी ती ४-५ वर्ष कशी काढली असतील आणि तेही अगदी जेमतेम पैशामध्ये कसं काय सगळं भागवलं असेल देव जाणे. हे सगळं असं जगताना प्राण तळमळणं स्वाभाविक आहे यात शंका नाही.

इकडे आल्यावर तात्याराव इंग्लंडमध्ये राहिलेले ते घर बघायची खूप इच्छा होती आणि आज त्यांच्या ५१व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून तिथे जाण्याचा योग्य सुद्धा जुळवून आणला. 65 Cromwell Avenue, Highgate, London N6 5HS हा त्या घराचा पत्ता. फारशी माहिती नसल्यामुळे आणि एकंदरच आज रविवार असल्यामुळे रस्त्यावर अगदी एखादा माणूस दिसत होता म्हणून तिथे पोचायला थोडा वेळ लागला. पण जेव्हा ती Blue Plaque बघितली ब्रिटिशांनी लावलेली तेव्हा अक्षरशः तात्यारावांनी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठीच्या केलेल्या कार्याचं गांभीर्य डोक्यात लक्ख प्रकाश पाडून गेलं. त्यावर असं लिहिलंय "GREATER LONDON COUNCIL. VINAYAK DAMODAR SAVARKAR 1883-1966 Indian Patriot and Philosopher lived here". मी त्या घराचे २ फोटो आणि माझ्या इथल्या रूममध्ये लावलेला असे फोटो टाकतोय या पोस्ट सोबत. त्यात कळेल कि साधारण ६-७ पायऱ्या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजा आहे. तिथे पोचल्यावर मी त्या पायरीवर एक पुष्पगुच्छ ठेवला आणि डोकं टेकून नमस्कार केला आणि तात्यारावांच्या चरणस्पर्शाचा अनुभव घेतला तेव्हा स्वतःचाच अभिमान वाटला. मामाशी फोनवर बोलणं झाल्यावर १५ मिनिटे निस्तब्ध होऊन फक्त ती निळी पाटी बघत उभा होतो. डोक्यात विचारांचा काहूर माजलं होतं आणि त्यात भरीस भर म्हणजे तिथे १ ब्रिटिश कुटुंब आलं ७० ओलांडलेले आजी-आजोबा, त्यांचा मुलगा-सून आणि २ नातवंड. त्यातल्या आजोबांचं आणि माझं संभाषण मुद्दाम इथे सांगतो -
आजोबा - "Are you Indian?"
मी - "Yes, I am"
Where are you from?
मी - "I am from Maharashtra"
आजोबा - "Oh I see, looks like you're Marathi so we should speak Marathi, हो कि नाही"
हे ऐकल्यावर मला स्वतःला सावरायला क्षणभर गेला कारण ते पूर्ण कुटुंब शुद्ध मराठी बोलत होत माझ्याशी आणि त्याहून अभिमानाची गोष्ट म्हणजे तिथून पुढचा पाऊण तास आम्ही चक्क शुद्ध मराठीत गप्पा मारल्या आणि त्यातले ४० मिनिटं मी फक्त ऐकत होतो. त्यांनी स्वतःहून मला विचारला कि तात्यारावांच्या पुण्यतिथीमुळे आला आहेस का इथे? मी हो म्हणताच त्यांनी त्यांच्या हातातला पुष्पगुच्छ मला दाखवून आम्ही पण त्यासाठीच आलोय असं सांगितलं. विशेष म्हणजे ते गेले ५१ वर्ष न चुकता इथे येतायेत. सगळ्यांनी अगदी नातवंडांनी सुद्धा पायरीवर डोकं टेकून नमस्कार केला आणि आमचं बोलणं पुन्हा सुरु झालं. त्या कुटुंबाचा तात्यारावांबद्दलचा आदर आणि निष्ठा बघून मनापासून भारतीयांची किव आली. घराच्या बाहेर गर्दी बघून आतून एक ब्रिटिश बाई बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं कि सकाळपासून १०-१२ ब्रिटिश कुटुंब येऊन गेली पण मी पहिलाच आणि एकमेव भारतीय बहुदा तिथे भेट देणारा. त्यांनी विचारला तुम्हाला जर घर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता आत येऊन (फोटो काढता आले नाहीत कारण त्यांनी तशी अट घातली होती) ते पूर्ण घर बघण्याची संधी मिळाली. मनापासून आनंद झाला. साला ज्या ब्रिटिशांविरुद्ध सावरकरांची लढाई होती ते सुद्धा नतमस्तक झाले त्यांचा चरणस्पर्श करण्यासाठी. सावरकरांनी लिहिलेलं सगळं साहित्य त्या आजोबांच्या घरात मराठी मध्ये उपलब्ध आहे आणि ख्रिस्ती असून सुद्धा ते रोज गीतेतले ५ श्लोक म्हणल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाहीत. मी त्यांचा फोटो काढायला गेलो तर त्यांनी मला सांगितलं आमचा फोटो काढण्यापेक्षा भारतातल्या प्रत्येक घरात सावरकरांचा फोटो लागेल यासाठी प्रयत्न करा तुम्ही सगळे भारतीय. निःशब्द झालो मी.

काय आपण कुठे आहोत? कधी कळणार आपल्याला सावरकरांची किंमत? भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान, ब्राम्हण आणि इतर समाज, आरक्षण, मोर्चे, निवडणुका, पक्ष, प्रचार, युती हे सगळं सोडून कधी बाहेर येणार आपण? आजपर्यंत गांधीमार्गाने क्रमणा करून घेतला ना आपण अनुभव? एकातरी दलित नेत्याने दुसरं पतितपावन मंदिर बांधलं का हिंदुस्थानात? तरीही सावरकर ब्राम्हणवादी.. हे जर असंच चालू राहिलं तर अखंड भारताचं स्वप्न भंगल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरंच आपल्याला आतातरी सावरकरांनी सांगितलेल्या तत्त्वांची अंमलबजावणी करायची नितांत गरज आहे. हे जर नाही केलं तर येत्या काही वर्षात भयाण परिस्थिती निर्माण होणार आणि त्यासाठी आत्तापासून मनाची तयारी करायला लागेल.

काही ज्या सहज शक्य आहेत त्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही -
१. आपल्या मुलांना Doremon बघायला जो काही वेळ देता त्यातले फक्त १५ मिनिटं अवांतर वाचन करण्यासाठी सावरकर उपलब्ध करून द्या. (मला इथे अगदी नमूद करावंसं वाटतंय कि माझी मामी सौ. Manjusha Kulkarni हिने नेहमीचं अशी पुस्तकं वाचण्याचा मुलांना आग्रह केला आणि त्याचा परिणाम आणि कालांतराने वागणुकीत झालेला बदल मी स्वतः अनुभवलाय)
२. सावरकरांचं साहित्य मिळत नाही/मिळालं तरी महाग आहे असली कारण यायला नकोत म्हणून इथे एक लिंक देतोय तिथे त्यांचा सर्व साहित्य मोफत PDF स्वरूपात मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये उपलब्ध आहे.

http://www.savarkar.org/en/download

http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php

३. आपण आपल्याच महाराष्ट्रात मराठी बोलत नाही हे अगदी चुकीचं आहे म्हणून आज पासून रिक्षावाला, भाजीवाला आणि पाणीपुरीवाल्या भैया सोबत सुद्धा मराठीतच बोलायचं.
४. फक्त पैसे कमावून आणि डौलदार शरीर असून उपयोग नाही त्यात निर्भीडपणा किती आहे हे महत्वाचं. हे अंगिकारण्याचा प्रयत्न करूया आणि मग काही दिवसात आपल्याला स्वतःलाच बदल जाणवू लागेल.

या अशा काही सोप्या गोष्टी करून जेव्हा आपण सावरकरांचे विचार घराघरात पोचतील, त्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव झाल्यावर जेव्हा मन पेटून उठेल त्यादिवशी सावरकरांनी केलेल्या कष्टाचं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या वाताहतेचं चीज झालं असं म्हणता येईल.

इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की comment मध्ये कळवा. ब्रिगेडी आणि गांधीवाद्यांनी कृपा करून आपली अक्कल पाझळु नये. शुद्ध मराठीत अतिभयंकर अपमान करण्यात येईल. शुद्ध मराठी याकरता कारण इंग्लिश शिकायला तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींवर डोकं लावल्यामुळे वेळ झाला असेल असं वाटत नाही.
वंदे मातरम...!!!
अखंड हिंदुस्थान अमर रहे...!!!

-- संकेत बोपर्डीकर
लंडन
27/02/17, 9:55 AM - Harshada Kolwadkar Marathe SHS: काय रे मैत्री म्हणजे काय?
सोडा हो. व्याख्या काय करायच्याहेत?
खरंतर व्याख्येत बसतं, ते नातं नसतंच कधी.
रोजरोज भेटतात, रोज एकमेकांशी बोलतात तेच खरे मित्र मैत्रीण असतात असं असतं का?
किंवा ते खरंच एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण असतात का? नाही.
मैत्रीला जात नसते, वेळ नसते, वय नसतं, अट नसते आणि रूपही नसतं.
प्रेमाच्या कित्येक पुढे गेलेलं नातं म्हणजे मैत्री.

मैत्री म्हणजे असं नातं ते जे मांडणं शब्दांच्या कुवतीचं कामच नसतं.

समोरच्याचा त्याच्या गुणदोषासकट स्वीकार म्हणजे मैत्री.
जगाने आपल्या मित्राला खूप मान द्यावा अशी अपेक्षा नसते,
पण त्याचा केलेला अपमान आपल्याला सहन होत नाही, तिथे असते मैत्री.
जिथे मनातलं बोलताना समोरच्याला आपण गमावू अशी भीती नसते, तिथे असते मैत्री.

हाताची हातावरली टाळी म्हणजे मैत्री,
प्रेमाने केलेली शिवीगाळी म्हणजे मैत्री,
राड्यानंतर गच्चीवरची मिटिंग म्हणजे मैत्री,
टपरीवरची वाटून घेतलेली कटिंग म्हणजे मैत्री

मैत्री म्हणजे जगासाठी अदृश्य पण दोघांच्याही मनात ठळक असलेलं खोल नातं.

जिथे देणंही हक्काचं असतं अन घेणंही हक्काचं असतं...ते नातं म्हणजे मैत्री.

हि मैत्री कुठे सापडते हो?
आयुष्याच्या टप्प्यावर अशी मैत्री कुठेही सापडू शकते.
कधी आईवडिलांत, कधी मुलांत,कधी बायकोत, कधी नवऱ्यात तरी कधी अनोळखी माणसात.
तुमचं हे आयुष्य अश्याच मित्र मैत्रिणीने भरलेलं असु दे हिच सदिच्छा
27/02/17, 4:37 PM - Srikrishna Pande: दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती — 'गणपत महादेव नलावडे, मेयर'! गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच! गणपतरावांनी खिन्नपणे एकवार सगळ्याकडे नजर टाकली. गणपतरावांना सारंच निरर्थक वाटत होतं.

जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.
"जी"?
"ही एवढीच पत्रं आलीयेत का रे"?
"व्हय जी"!
"नीट आठवून सांग. एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या"?
"न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं".

यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले,
"कोन्ता खास सांगावा यायचा हुता का"?
"नाही नाही. काही नाही. जा तू".
"सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का"?
"नाही नाही. अरे खरंच तसं काही नाही. जा तू", गणपतराव चांगलेच वरमले. आपण जरा अतिच तर करत नाही ना, असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.
शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,
"अरे ऐक. आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना? ठिक आहे तर! आता कुणालाच आत सोडू नकोस".
"जी" म्हणून शिपाई निघून गेला. 'आपण स्वत:च करावी का चौकशी?', गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण 'नको नको. ते बरं दिसणार नाही', असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले. हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.

गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत.

गणपतरावांनी जागेवरूनच "काय चाललंय रे? कोण आहे?" असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच 'काय झालं?' असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,
"सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात".
गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?

त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,
"मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं.."
'तात्याराव? बॅ. सावरकर?' हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,
"..मी म्हटलं, देईन की त्यात काय! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की! घेतलं पत्र आणि आलो इकडे! तर हे महाशय आत सोडेचनात! साहेब कामात आहे म्हणे! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या.."!!
असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले. गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतू तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,
"जगतापसाहेब, चहा घेता ना"?
"छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पाहात थांबलेयत. ते काय.. ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला".
यावर गणपतराव म्हणाले, "हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या"! मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, "पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले"! शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. 'आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय' असं वाटून जगतापचीही छाती फुगली! त्या आनंदातच तोही परतला.

दोघेही गेल्यावर गणपतरावांनी अक्षरश: झडप घालून ते पत्र हातात घेतलं. आपल्या गुरूंचं पत्र! आपल्या देवाचं पत्र!! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र!!! गेले चार दिवस या-त्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा येत होत्या. पण आपली नजर लागली होती ती केवळ याच पत्राकडे. कित्येकदा वाटलं होतं की धावत जावं तात्यारावांकडं आणि सांगावं.. —
'तात्याराव.. तात्याराव बघा! मी मेयर झालोय तात्याराव! या विद्वज्जनांच्या पुणे नगरीने हिंदूमहासभेच्या बाजूने कौल दिलाय! तात्याराव, तुमचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात आज अजून एक पाऊल पुढे टाकलंय आपण! आणि त्या पावलात कणभर का होईना पण तुमच्या या शिष्याचा वाटा आहे, या गणपत नलावड्याचा वाटा आहे, तात्याराव'!

आणि ज्यावेळी येणाऱ्या संदेशांपैकी एकही संदेश तात्यारावांचा निघत नव्हता, तेव्हा कसे खट्टू झालो होतो आपण! नुसत्या आठवणीनेच गणपतरावांना एखाद्या लहान बालकासारखे हसू फुटले! त्याभरातच थरथरत्या हातांनी त्यांनी ते पत्र एकवार भाळी लावले. मग हलक्या हातांनी त्यांनी ते फोडले. आत सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद! पत्राच्या सुरुवातीस सावरकरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहिलेल्या 'श्रीराम'कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. सावरकरांची छबी दिसली असावी बहुतेक गणपतरावांना त्यात! ते अधीर होऊन वाचू लागले —

"प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस, सप्रेम नमस्कार.
पुण्याची धुरा आता समर्थ हातांत आलीये म्हणायची! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच! मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे! उदाहरणार्थ – ते 'स्कूल' म्हणतात, मला त्यासाठी 'शाळा' हा पर्याय सुचतो. ते 'हायस्कुल' म्हणतात – त्याला आपण 'प्रशाला' म्हणू शकतो. ते ज्याला 'टॉकी' अथवा 'सिनेमा' म्हणतात, त्यासाठी 'बोलपट' अथवा 'चित्रपट' असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे. 'अप-टु-डेट'ला 'अद्ययावत' म्हणता येईल, 'ऍटमॉस्फिअर'ला 'वायूमान' म्हणता येईल, 'पोलिस'ला 'आरक्षी' म्हणता येईल. 'तारीख'ला 'दिनांक' म्हणता येईल. असे बरेच काही. मात्र माझे घोडे या 'मेयर' शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला 'मेयर' म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — महापौर!
साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास 'मेयर' म्हणतात. अश्या मोठ्या गावांच्या मागे 'पूर' लावायची आपल्याकडे पद्धत आहे. अगदी वैदिक काळापासून आहे. आणि अश्या 'पुरा'त राहाणाऱ्या रहिवाश्यांना म्हणतात, 'पौरजन'. तुम्ही या पुणे नामक 'पुरा'चे प्रमुख आहात. प्रथम नागरिक. त्याअर्थी तुम्ही झालात – महापौरजन! आणि त्याचेच सुटसुटीत रूप आहे 'महापौर'!
असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या-सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि ताबडतोब धाडलेसुद्धा! तेव्हा, महापौर गणपतराव नलावडे, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा"!!

खाली दिनांक आणि सावरकरांची घुमावदार स्वाक्षरी होती! पत्र वाचत असतानाच गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्त्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धीमत्ता, यांच्यासमोर नत झाले होते. भानावर येताच गणपतराव धावत-धावत आपल्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना असे आलेले पाहून बाहेर उभे असलेले लोक चमकलेच! शिपाई बिचारा गोंधळून उभा राहिला. तिकडे कुठेच लक्ष न देता त्यांनी दारावर लावलेली पाटी उतरवण्याची खटपट चालू केली.
"काय झालं सायेब", शिपायाने बावरून विचारले.
"तू लागलीच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक. अश्शीच नक्षी हवीये अगदी! फक्त त्यावर लिहिलेलं हवंय – 'गणपत महादेव नलावडे, महापौर'! समजलं? जा लवकर", असे म्हणून त्याच्याकडे वळूनदेखील न पाहाता गणपतरावांनी पाटी उतरवण्याचे काम सुरूच ठेवले!

शिपाई बिचारा काहीच न समजून जागीच उभा होता. बेट्याला काय कल्पना की, तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला होता! हो, सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि लवकरच सर्वमान्य होणारी देणगी दिली होती! आज एका शब्दाचा जन्म झाला होता!!

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ