Skip to main content

कवी ग्रेस च्या स्मृतिदिनानिमित्त

24/03/17, 7:12 PM - Messages you send to this group are now secured with end-to-end encryption. Tap for more info.
26/03/17, 11:28 AM - Sandesh Nayak: नाशिक - पंचवटी, गोदाघाट,भाजीबाजार, येथे *100"200"* फूट *मराठी_नववर्षानिमित्त* काढलेली भव्य *महारांगोळी*....
26/03/17, 11:29 AM - Sandesh Nayak: IMG-20170326-WA0021.jpg (file attached)
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: ग्रेस स्मृतिदिन

मी खरेच दूर निघालो आहे
तू येऊ नको न मागे
पाउस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे
शेतावर ढग अडलेला
घे त्याला मागून पाणी
झाडावर कोकीळ येता
घे मागून एक विराणी
या फुलपाखारांनाही
ते उरेल मरणावाचून
सगळ्याच ऋतूंना मिळते
दु:खाचे उत्कट दान...
भरपूर सोडली आहे
पडवीत निजेला जागा
अन दूर तुझ्याहून दूर
प्राचीन फुलांच्या बागा...
थिजलेल्या वेळुनमधला
लागटेल तुलाही वारा
पाउस थांबल्यावरही
ताऱ्यांच्या पडतील गारा...
उध्वस्थ मंदिरे येतील
नजरेत तुझ्या दीप्तीने
खंडांतर करते पक्षी
दिसतील तुला तृप्तीने...
माझ्याहून गर्द मिठीचा
अंधार गळ्याला येईल
शिल्पास रूप देणाऱ्या
हातांचा विळखा होईल...
तळहातावरचा फोड
फुटणार अशा अनुरादे
वेदनेस नसते वीण
पडछाया तुडवीत जाणे
अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे...!

ग्रेस.
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: भाषाच ही निकामी शब्दासही पुरेना
संवेदनाच द्यावी अर्थास काय पुन्हा ?

ग्रेस.
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: यात काय करायचे असते आत्मसात ?
माझ्या धैर्याचा पुरावा ?
फकिरांचा उरुस ?
वसंताच्या पूर्वार्धातील पाऊस ?
हात सोडवून घेतानाची बातमी ?
स्तनावरचा तीळ ?
संन्याशाची आत्मपीडा ?

जिथे तुम्हाला सत्य सापडेल
तिथून मला निरोप धाडा...

ग्रेस.
चंद्रमाधवीचे प्रदेश.
26/03/17, 1:52 PM - Sandeep Wachasunder SHS: तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे
तीही अशा कातरवेळी,
उदाच्या नादलहरीसारख्या
संधीप्रकाशात...
आणि आई नसलेल्या पोरासारखे
हे माझे शहाणे डोळे
हलकेच जोडून देतो
नदीच्या प्रवाहात...

ग्रेस.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...