Skip to main content

π Day


14/03/17, 1:16 PM - Ravindra Chandorkar:

आज π दिवस च्या निमित्ताने...

|| भारत आणि पाय (π) ||
अंदाजे ६०० इ.पु. मध्ये "शुल्बसूत्र" मध्ये पाय ची व्याख्या (९७८५/५५६८)^२ ≈ ३.०८८ अशी दिलेली सापडते. १५० इ.पु. किंवा त्या आधी पाय ची व्याख्या १० चा वर्गमूळ ≈ ३.१६२२ अशी सापडते.

४९९ इ.स. मध्ये आर्यभट्ट यांनी π साठी ३.१४१६ वापरल्याचा पुरावा आहे. हेच आपण सध्या शाळेत वापरतो.
π ची सर्वात गंमतीशीर गोष्ट अशी की याचे आकडे अनंत आहेत. यालाच आपण Infinite series असे म्हणतो. पण या Infinite series चा पहिला वापर सुद्धा भारतातच झालेला आहे.

केरळचे नीलकंठ सोमयाजी (१४४४ - १५४४) या शतायुषी गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाने आपल्या "तंत्रसंग्रह" या ग्रंथात हे Infinite series मांडले आहेत. यालाच गणिताच्या विश्वात "माधव सीरीज" (Madhav Series) म्हणून ओळखतात. हे नाव संगमग्रामचे माधव (१३४० - १४२५) यांच्या आदरार्थ ठेवले गेलेल आहे. यांनी आपल्या अभ्यासात ११ आकड्यांपर्यंत π चे मूल्य मांडले होते.

पुढे "युक्तीभाषा" या १५३० च्या ग्रंथात "माधव सीरीज" चे सखोल भाष्य सापडते.

शेवटी भारताचे गणित शिरोमणी श्रीनिवास रामनुजन यांनी पाय चे मूल्य शोधण्याचे तब्बल ३० जलद सूत्रांचा शोध लावला. यामुळेच आज आधुनिक गणिताच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा पाया रामनुजन यांनी रचलेला आहे.

========= π दिवस ===========
"१४ मार्च" हे अमेरिकन पद्धतीत ३/१४ असे लिहिले जाते. π चे पहिले ३ आकडे ३.१४ असे आहेत. यामुळे १४ मार्च हा π डे म्हणून साजरा केला जातो.

तसेच १४ मार्च रोजी अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांची जयंती सुद्धा असते.

Messages circulated on WhatsApp.





Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...