Skip to main content

आमरस

*आमरस*

होळी झाली की पाडव्याचे आगमन होऊ लागते...आणि त्याच वेळी वेध लागतात आंब्याचे...अर्थात आमरसाचे...

खर तर आमरसाची सुरुवात अक्षयतृतीयेपासून करतात पण तो पर्यंत काही कळ निघत नाही.... जीभ आणि पोट अक्षरशः बंड करू पहात...

इतक्या वर्षात कोकणात बऱ्याचश्या आढी आणि वाड्यावर म्हाळसाच्या खुप ओळखी झालेल्या असल्याकारणाने तिकडून फोन/निरोप यायला सुरुवात होते..

म्हाळसाच्या बऱ्याच फोनाफोनी नंतर अगदी अस्सल आणि निवडलेल्या रसभरीत हापूस आंब्याची सिझनची पहिली पेटी घरात येते आणि पाडव्यापासून सुरु होतो आमरसाचा एक भव्यदिव्य रसभरीत सोहळा व उभे होते पुढील दोन महिन्याचे आंब्याचे अर्थात आमरसाचे महानाट्य...

पेटीतले पहिले दोन आंबे देवाला प्रसाद म्हणून ठेवले की अगदी आतुरतेने वाट पहायची पाडव्याची...

त्या दिवशी आमरसाचा श्रीगणेशा होतो..

त्या आधीच दोन दिवस घरात आंब्याच्या वासाचा घमघमाट असतो...बाहेरुन घरात प्रवेश केल्यावर या वासाने मन प्रफ्फुलीत होते...अश्या या वासाचे वैभव छाती फुगवून मिरवायला जाम आनंद होतो...

मग येतो पाडवा...या दिवशी पहिला आमरस पुरीचा बेत...

अक्षरशः एखाद्या युद्धाला जाण्याच्या आवेशात त्यावेळी आमरसावर तुटून पडण्यासाठी मी आतूर असतो...

म्हाळसा आमरस तयार करत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले की जाणीव होते की त्या आमरसात तिचा भाव, तिचे प्रेम, तिची माया, तिचे ममत्व सगळ सगळ उतरवत असते...

चांगला घट्ट अस्सल हापुस आमरस तयार होतो...

यावेळी आपण मात्र सज्ज असावे...देवाला प्रसादाचे ताट नैवैद्यला दिल की आपण आपली राजेशाही बैठक मारावी...

ते टेबल खुर्चीवर बसून आमरस खाण्यात काही राम नाही.... ते म्हणजे निव्वळ अरसिकेतेचे लक्षण...

मस्त जमिनीवर मांडी बिंडी घालून फतकल मारावी...

अंगावर पांढरा शुभ्र बनियन आणि साधी विजार किंवा पायजमा असा साधा मोकळा ढाकळा ऐसपैस पोशाख असावा...

मस्त समोर ताट यावे...पूरी किंवा पोळी...एखादी चटपटीत,चमचमीत भाजी ... कुरकुरीत पापड़ किंवा कुरडई ..... कुडकुरीत भजी...

आणि आणि आणि .....चांगला वाडगा भर आमरस....

आता हा वाडगा म्हणजे कमीत कमी दोन वाट्या आमरस बसेल एवढा मोठा असावा...

उगाच चिचुंद्र्या वाटीत आमरस घेवून या राजश्री पदार्थाचा अवमान करू नये..

ताट समोर आले की त्या घट्ट रवाळ थंडगार आमरसावर घरातल्या चांगल्या कढत तुपाची धार सोडावी..

आपल्या हाताच्या अनामिकेने ते तूप त्या वाडग्यातल्या आमरसात मिसळावे ...चुकूनही चमचा वापरु नये...आणि यथेच्छ मिसळून झाले की आमरसाने न्हालेले ते बोट डोळे घट्ट मिटून तोंडात टाकावे आणि पहिल्या वहिल्या आमरसाच्या चवीचा स्वाद घ्यावा...

आमरसाची चव लागतात जिभेची रंध्रे रंध्रे उत्तेजीत होवू लागतात...घसा आमरसासाठी व्याकूळ होऊ लागतो ....पोटातला अग्नी प्रज्वलित होतो आणि जठरे आमरसाला मिठी मारण्यास आतुर होवू लागतात...


त्याच वेळी भीमपलासी किंवा मुलतानी रागातली उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची मंद आवाजातली सनई सुरु असावी आणि त्याला त्रितालाची साथ असावी..

अहाहा...

आणि मग सुरु करावा आमरस सेवनाचा साग्रसंगीत सोहळा...

प्रत्येक घास आणि त्याबरोबरचा प्राशन केलेला  आमरस तनामनात एक सळसळता उत्साह जागृत करतो...

हात आणि जिभ यांच्यात स्पर्धा सुरु होते...जीभेची अभिलाषा आणि हाताची आमरस धारण करण्याची नजाकता यात रस्सीखेच सुरु होते..

जीभेला झालेला आमरसाचा पहिला अभिषेक थेट मेंदूपर्यंत जातो...डोळ्यात तृप्तीची एक चमक दिसू लागते आणि तळपणारी रसना आणखी आमरसाची याचना करते...

हा आमरसाच्या प्राशनाचा सोहळा वाड़ग्या मागून वाडगे सुरु होतो...

आतड़े आमरसाला आलिंगन देत सामावून घेतात...घसा अविरत आनंदाने कृतज्ञ होत असतो...

हे सर्व होत असताना आपल्या पांढऱ्या शुभ्र बनियनवर पडलेले, ओघळलेले आमरसाचे डाग म्हणजे आपल्या अभिजात आमरस रस-ग्रहण शक्तीचे द्योतक असते ते अगदी अभिमानाने मिरवावे...

वाडग्यातून रस ओरपताना आपल्या मिशांच्या केसांच्या टोकावर चिकटलेले आमरसाचे दवबिंदू आपल्या आमरसा बरोबरच्या मधाळ नात्याचे प्रतिक असतात..

पाच सहा वाडग्यांच्या प्राशनानंतर चार ढेकरांच्या सलामीने आमरस पोहोचल्याचे पोटाकडून कळवण्यात येते...

आणि रिकाम्या होत आलेल्या पातेल्याकड़े कृतार्थ नजरेने बघत आणि लवकरच पुनर्भेटीची अभिलाषा बाळगत हा सोहळा संप्पन होतो...

ईती श्री स्कंदपूराणे रेवाखंडे आमरसाध्याय समाप्त: ऊदरारप्रणमस्तू:

As received on whatsapp.

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ