Skip to main content

#चिवड्याचे_थालीपीठ#

 
या पदार्थासाठी घरी जवळपास 10/15 दिवस जुना आणि कुणी खात नसल्याने दीनवाणे कटाक्ष फेकत असलेला चिवडा हवा. आधी या चिवडा संपावा म्हणून घरातल्यांना आग्रह करून त्यांची बोलणी खाल्लेली असावी म्हणजे आई तुला खपवाखपवी करायला आम्हीच लागतो का असे मुलांनी म्हणायला हवे. ए तुझे चिवडा पूराण बस कर बाई तु खा मला नको असे नवर्याने पण म्हणायला हवे. मग मी तरी तुला का खाऊ असे दुर्लक्ष आपण पण करायला हवे. असे काही घडले की चिवड्याची खूमारी अधिक वाढते.
तर असा चिवडा खसकन डबा ओढुन वसकन  मिक्सरच्या भांड्यात ओतावा. खर्रकन मिक्सरचा कान पिळुन चिवड्यातले दाणे  कढीपत्ताा डाळे मिरच्या या सह तो मिक्सरमधून बारीक दळावा. परातीत घेऊन त्यात वाटीभर बेसन व वाटीभर कणीक बचकभर तिखट चिमूटभर हळद चवीनुसार मीठ कचाकचा कापलेला कांदा घालून वचकटपणे मिसळावे. शेतकर्यांच्या संपामुळे 20 रू ला 20 काड्या मिळालेल्या कोथिंबिरीच्या काड्यातल्या 5/6 काड्या ओढून कराकरा चिरून त्यात घालाव्यात.  पाणी घालून लेकराला जितक्या मायेने गोंजारतो तसे गोंजारून गोळा मळावा.  धपकन तवा ठेऊन त्यावर सर्रकन तेल ओतावे. मग थालिपीठाचा गोळा त्यावर ठेवून नवर्याने सांगितलेली भाजी न आणता भलतीच भाजी आणली की कित्ती कित्ती प्रेमाने त्याच्याकडे बघतो तितक्या प्रेमाने थालीपीठाकडे बघून त्याला थापट्या मारून गोल थापावे. मग निर्ममतेने त्याच्या पोटात बोटे खूपसुन त्यात तेल भरावे. मग झाकण ठेवून त्याला कोंडावे. ते थालिपीठ चर्र आवाज करून निषेध करायला लागले की उलटावे. खालुन ते संतापाने लाल झाले असते मग दुसर्या बाजूला पण चांगला चटका द्यावा. 
असे खरपूस भाजलेले थालीपीठ भस्सकन पानात काढावे एव्हाना नाके मुरडणार्या मुलांच्या नाकात खमंग दरवळ शिरलेला असतो. मग ते खस्सकन हातातले ताट ओढून तुकडा मोडुन गपकन तोंडात घालतात. मग wow आई सुपर साॅल्लीड अशा प्रतिक्रिया येतात आणि आपले कान तृप्त होतात. आई परत कर असेच अशी प्रतिक्रिया येते मग मेल्यांनो परत चिवडा करते आता अशी प्रतिक्रिया देऊन त्यांच्या गोंधळलेल्या चेहर्याकडे बघुन दुसरे थालीपीठ लावायला घ्यावे... अशी ही चिवड्याच्या थालीपीठाची कहाणी सुफळ संपूर्ण. .....

As received on whatsapp

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...