Skip to main content

जंगल पेरले

कोणी गच्चीत फळे, भाज्या लावून मळा करतात. कोणी अंगणात छानशी बाग करतात. पण, श्री. व सौ. नारगोळकरांनी चक्क जंगल लावले! पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या खडकवासला येथे २० एकर जमिनीवर चक्क जंगल पेरले!

भारतभर अनेक वनात फिरलेले प्रमोद नारगोळकर, यांनी एकदा मनात घेतले, आपणच वन का तयार करू नये? लवकरच खडकवासला येथे जमीन घेतली. पुढे जमेल तसे आणि जमेल तेंव्हा जवळपासची जागा घेत राहिले. देशभरातून विविध झाडांची रोपे आणून येथे वृक्षारोपण केले. आसाम, हिमाचल, आंदमान, श्रीलंका, आफ्रिका अशी ठिकठिकाणहून ५०० हून अधिक प्रकारचे वृक्ष त्यांनी सिपना वनराईमध्ये लावले.

सिपना वनराईमध्ये वृक्षांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. या मध्ये एक कमंडलू वृक्ष पहिला. याचे फळ अर्धे कापून आतला गर काढला की त्याचे टणक कवच वाडग्यासारखे वापरता येते, म्हणून त्याचे नाव कमंडलू. आणि एक ब्रह्मदंड वृक्ष. याच्या लाकडापासून दंड-कमंडलू या जोडीतला दंड तयार केला जातो. तसेच कृष्णवड, मुचकुंद, अर्जुन, कुंभ, रुद्राक्ष, ताम्हण, चंदन, कदंब, समुद्रफळ, रिठा, कवठ, काटेसावर, नागचाफा, सीताशोक, पांगर, पळस, आंबा, फणस, चिंच, वड, जायफळ, निरगुडी, तुती, बहावा, गुलमोहर, आवळा, विलायती चिंच, बिबा, खैर, केवडा, रोहन... असे कित्येक प्रकारचे जवळ जवळ २०,००० वृक्ष इथे आहेत!

नारगोळकरांनी आतापर्यंत ४०,००० रोपे तयार करून वाटली. तर वनराईकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा ४०० झाडे लावली. विशेष म्हणजे या वनराईतील एकही फळ ते तोडत नाहीत. ही वनराई त्यांनी प्राणी व पक्ष्यांसाठीच केली आहे, त्यामुळे ते फळ पक्ष्यांनी खावे, माकडांनी खावे आणि पिकल्यावर खाली पडून त्यातील बिया आपोआप रुजाव्यात इतकीच इच्छा!

महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्यासाठी नारगोळकरांना "वनश्री" पुरस्कार देऊन गौरव केला!  

आता हा सगळा पसारा त्यांच्या पत्नी नयना ताई सांभाळतात. मागच्या २५ वर्षात सिपना वनराईने या भागाचे संपूर्ण रूप पालटले आहे! पालापाचोळा जमिनीत जिरल्याने, कधीकाळी उजाड असलेल्या माळरानाच्या  जमिनीचा पोत  सुधारला आहे.  उंच झाडांमुळे अनेक पक्ष्यांना आसरा मिळाला आहे. अनेक पक्ष्यांच्या जाती इथे पाहायला मिळतात. अनेक प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे प्राणी यांना देखील इथे घर मिळाले आहे.

नयना ताईंनी पावसाचे पाणी साठवायला लहानसे तळे बांधले आहे. ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पाणवठे बांधले आहेत. या तळ्याभोवती आणि पाणवठ्यावर अनेक पक्षी जमतात. थंडीच्या दिवसात इथे स्थलांतर करून येणारे पक्षी देखील पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणासाठी आणि पक्ष्यांची छायाचित्रे घेण्यासाठी सिपना वनराई एक निवांत जागा आहे. त्यांचे पुत्र अमोल नारगोळकर हे छायाचित्रकार असून, खास छायाचित्र काढण्यासाठी त्यांनी जागा करून घेतल्या आहेत.



Botany चा अभ्यास करणाऱ्यांना इथे निरीक्षणासाठी एक दिवस कमी पडतो. ही वनराई पाहायला, Botany च्या विद्यार्थ्यांप्रमाणेच, अनेक शाळेच्या सहली येतात. कौटुंबिक सहली देखील येतात.

सिपना वनराई मध्ये झाडांची रोपे, तसेच सेंद्रिय खत उपलब्ध असते. इथे एका दिवसाची कौटुंबिक सहलीची व्यवस्था आहे. निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस राहण्यासाठी ही निवांत जागा आहे. Smart City मध्ये असे Oxygen Hubs ठिकठिकाणी असले पाहिजेत. सिमेंटच्या जंगलात असे झाडांचे जंगल उभारले पाहिजे, असे नयना नारगोळकर म्हणाल्या.

नयनाताई या वनराईची अगदी लेकराप्रमाणे काळजी घेतात. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणे, वणव्यापासून संरक्षण करणे, वृक्षातोडी पासून रक्षण करणे, अतिक्रमणावर लक्ष ठेवणे, सेंद्रिय खत प्रकल्पावर देखरेख, Rain Water Harvesting च्या प्रकल्पावर देखरेख, असे एक न दोन, भरपूर गोष्टींची काळजी त्या वाहतात. हा मोठा पसारा त्या आईच्या मायेने सांभाळतात. नयना ताईना भेटल्यावर आपण आधुनिक काळातील, आधुनिक शहरातील वनदेवी पहात आहोत, असे वाटल्या शिवाय राहत नाही! 

Contact for bookings: 9370670478 / 9822048540 / 02024324115

Information as received on WhatsApp.

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...