Skip to main content

रिटायर्ड माणूस

*जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस...*
             *- पु.लं.*

रिटायर्ड माणसांनो,
भावांनो,
सहकार्यांनो...

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा
प्राणी म्हणजे रिटायर माणूस.
पु.लं च्या भाषेत सांगायचं म्हणजे
पुण्याच्या दुकानदारांच्या नजरेतून
सगऴ्यात दुर्लक्षीत प्राणी म्हणजे
गिर्हाईक.  अगदी त्याचप्रमाणे
समजा...

गरिब बिचारा, भांबावलेला, 
बावरलेला, आत्मविश्वास
हरवलेला असा हा प्राणी असतो.

कोणे एके काळी या माणसाचे
पण सुगीचे दिवस असतात.
त्याचा रूबाब वाखाणण्याजोगा
असतो. सर्व गोष्टी हातात मिळत
असतात. घरी व कार्यालयात.

टेबलावरून फायली फिरत
असतात. मोठ्या मोठ्या
करारांवर सह्या होत असतात.
नुसती बेल वाजवलीना, तरी 
तीन तीन शिपाई धावत येत
असतात. एक चहा घेऊन, एक बिस्कीटं घेऊन, तर एक
बडीशोप घेऊन. 

अहाहा... त्या शिपायाच्या
चेहऱ्यावर भाव असतो, 
तो हा, की साहेब हे फक्त
आपल्याचसाठी. 

आणि आता, टेबलावर 
मिरच्यांची देठं काढली जातात.
भेंडी पुसली जाते. लसणाच्या
पाकळ्या मोकळ्या होतात.
अरेरे... किती हा विरोधाभास.

रिटायर्ड माणसाला कुठंही डोकं
चालवायला वा मध्ये घालायला
बंदी असते. कधी कधी मला तर
वाटतं, की रिटायर माणूस त्याचं
डोकं फक्त उशीवर टेकवायलाच
वापरत असावा सध्या. बिच्चारा.

कुणी समदु:खी माणूस त्याला
घरी भेटायला आलाच, तर हिंदी
चित्रपटात यात्रेत हरवलेला भाऊ
भेटल्यावर नायकाला जो आनंद
होतो, अगदी तसाच किंबहूना
त्याहून जास्त आनंद रिटायर्ड 
माणसाला होतो. पण त्यांचं
बोलणं किचनचा "सी.सी." टिपत
असतो, हे त्याच्या ध्यानी नसतं.

आपल्या सुगीच्या दिवसांत हा
माणूस कट्टयावर मित्रांसमवेत
हास्य विनोद करत असतो.
मधून मधून नेत्र व्यायामही 
सुरू असतो. तोच बिचारा 
आता मंदिराच्या कट्टयावर वा
वाचनालयाच्या ओट्यावर
विसावलेला असतो. 

ज्या चौपाटीवर सणसणीत 
भेळ, रगडा, बर्फाचा गोळा
खातांना नजर भिरभीरत 
ठेवलेली असते, गार वार वारा
अंगावर घेत रिटायर्ड नंतरच्या
आयुष्याची स्वप्न रंगवलेली
असतात, तिथेच चटई टाकून 
योगा करायची वेळ आलेली
असते. 

दिवसभरांत टोमणे ऐकावे
लागतात. "ते शेजारचे बघा, 
या वयातही किती फीट व धीट
आहेत. नाही तर तुम्ही बघा, 
भित्रे काळवीट". वगैरे वगैरे. 
अरे कांय, आहे कांय हे...!?

एक नवीन मुद्दा मला कळलांय,
तो तुम्हाला सांगतो. या रिटायर्ड
माणसांचा उल्लेख पुराणांत
म्हणजे महाभारतातसुध्दा आला
आहे. 

चक्रावलात नां..? मग ऐका.
समोर सागराप्रमाणे पसरलेला
विशाल सैन्याचा समुह. त्यातले
स्नेही, आप्तेष्ट पाहून अर्जुन 
जेव्हा युध्द करायला नकार देतो,
तेंव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला
म्हणतात...

*अर्जुना असा रिटायर्ड माणसासारखा हताश व निराश होऊ नकोस. उठ व लढायला सज्ज हो...!!*

पुढं कालांतरानं रिटायर हा 
शब्द गीतेतून वगळण्यांत 
आला. कां, तर भविष्यांत 
रिटायर्ड लोकांच्या भावना 
दुखाऊ नयेत..!!

बघा, लोकहो... त्या काळांत 
पण यांच्या भावनांची कदर 
केली जात होती आणि आता
सुकलेल्या पालापाचोळ्याप्रमाणे
त्या पायदळी तुडवल्या जातात.
अरेरे...!!

सरते  शेवटी भगवंतानं रिटायर्ड
लोकांना हताश न होण्याचा मार्ग
सुचवला.भगवान म्हणाले...

"अरे वत्सा, रिटायर्ड माणसा...
हताश व निराश होऊ नकोस, 
मी तुला फंड व पेन्शन या 
दोन गुळाच्या वेेली देतो. जो
पावेतो त्या तुझ्याकडं आहेत,
तोवर तुला मरण नाही". 

"मरण नाही, म्हणजे खरं मरण
नाही. रोजच्या जीवनात तू ज्या
यातना वा अपमान भोगशील, 
त्या यातना तुझ्याकडं असलेल्या
या दोन शस्रांनी सुसह्य होतील.
फंड व पेन्शन जो पावेतो
तुझ्याकडे आहेत, तो पर्यंत सारे
तुझे असतील".

*"उठ, वत्सा उठ आणि* *आयुष्याच्या*
*संग्रामास तयार हो. उठ"...!!*

खाडकन जाग आली...


भानावर आलो, आणि माझी *ती दोन शस्र* जागेवर आहेत, की नाही हे बघण्यासाठी अंथरूणातून बाहेर आलो.

Source WhatsApp .
Author unknown.

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...