Skip to main content

आषाढी_एकादशी निमित्ताने आपण या दिवसाशी निगडित धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांची माहिती.

आज '#आषाढी_एकादशी' आजच्या दिवसाचे धार्मिक महत्व महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.

या दिवसाच्या निमित्ताने आपण या दिवसाशी निगडित धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांची माहिती करून घेऊ.

         संतशिरोमणी ज्ञानदेवांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी आळंदीला संजीवनी समाधी घेतली. असे म्हणतात की, त्यावेळी त्यांनी हातातला दंड [ काठी ] मातीमध्ये रोवला आणि ते समाधी विवरामध्ये गेले. त्या दंडाने मूळ धरले आणि त्याला पालवी फुटून कालांतराने त्याचा वृक्ष झाला. तोच हा #अजानवृक्ष ! संत नामदेव म्हणतात - 
                                                           
अजानवृक्ष आरोग्य अपार
समाधीसमोर स्थापियेला I
कोरडया काष्ठी फुटीयेला पाला 
तेव्हा अवघीयाला नमस्कारी II
        
         संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थानी असलेला अत्यंत पूज्य आणि पावन समजला जाणारा अजानवृक्ष जनमानसात आदराचे स्थान मिळवून बसलेला आहे. त्याला अनन्यसाधारण धार्मिक महत्व प्राप्त झालेलं आहे. अजान वृक्षाची किमया अनेक औषधे बनवण्यासाठी होते. तसेच अध्यात्मात त्याचा सिद्धी साधनेसाठी उपयोग असल्याचे म्हटले जाते. ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थानी असलेल्या अजानवृक्षाची फळे, पाने तोडण्यास सक्त मनाई आहे. त्या वृक्षछायेखाली अनेक साधक ज्ञानेश्वरीचे पारायण करताना आपणास आढळतील. त्या काळात साधकाच्या या ज्ञानेश्वर पोथीवर पारायण काळात एखादे जरी पान पडले तरी ते भाग्याचे समजले जाते व त्या साधकाला सिद्धी साठी पुढचा मार्ग सक्रीय होतो अशी तेथील परंपरा आहे. 
       अजाणवृक्षाचं वनस्पतिशास्त्रीय नाव आहे Ehretia laevi( एहरेशिया लेव्हीस ) त्याचा समावेश भोकर कुळात केला जातो. 
          मराठीमध्ये  अजाणवृक्षाला ' #दातरंग '  असंही म्हणतात. ह्या झाडाची साल चघळतात आणि त्यामुळे दात रंगतात- लाल होतात- म्हणून हे नाव !
          फुलण्याचा हंगाम वसंत ऋतूमध्ये असतो. कोवळ्या, हिरव्या फांद्यांच्या टोकांना तसेच पानाच्या कक्षांमध्ये लहान लहान पांढरया शुभ्र फुलांचे छोटे छोटे तुरे येतात. फुले पाच ते दहा मिलिमीटर आकाराची, तरकाकृती असून त्यांना मंद सुवास असतो.
          उन्हाळ्यात वाटाण्याएवढ्या, गोलसर, गुळ्गुळीत हिरव्या फळांचे घोस दिसू लागतात. पिकल्यावर फळे नारिंगी किंवा भगव्या रंगाची होतात आणि शेवटी वळल्यावर काळी आणि सुरकुतलेली दिसतात. प्रत्येक फळात एक ते चार सूक्ष्म बिया असतात. पिकलेल्या फळातील गर खान्याजोगा असतो, पक्षी प्राणी आवडीने खातात. 
           अजान वृक्षाचे फळ ते श्वानमुखी जाणं  ! ते सेवन करता मनुज अजरामर होय निश्चित  II  हा वृक्ष फळ मुळासहित अत्यंत उपयुक्त देह व लोह सिद्धी करणारा आहे.

         पंढरपूरच्या वारीशी निगडित अजून एक वृक्ष आहे 
तो म्हणजे #नांद्रुक देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता अर्थातच ज्यावेळी तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.
या घटनेशी निगडित ओव्या आपल्याला किर्तनातूनही ऐकायला मिळतात.

देहूच्या माळावरी कुणी सांडीला माळ बुक्का
तुकाराम आलं खाली कशा हालती नांदरुका

पहाटेच्या प्रहरामध्ये कोण म्हणतो हरी हरी
तुकोबा महाराजाची स्वारी नांदुरकीच्या झाडाखाली

आळंदी माळावरी कुणी तिथ नांद्रुक लावली
आता बाळयाला माझ्या वारकर्याला सावली

नांदुरकीचे झाड हालत लखा लखा
बिजेला आला तुका

       #कान्होपात्राचे झाड पूर्वी पंढरपूरला विठ्ठल मंदिरात होते. पाहताना झुडूप वजा वाटतं असले तरी हा जाड खोडाचा शातायुषी वेल आहे. वाघाटीचा वेल म्हणजेच कान्होपात्रेचं झाड. संत कान्होपात्रेचं जबरदस्तीने अपहरण करून नेत असताना तिने पांडुरंगाचे चरणी आपला देह ठेवला. तिथे एक तरटीचं झाड उगवलं तेच ते कान्होपात्रेचं झाड! 
नको देवराया अंत असा पाहू हा संत कान्होपात्रेचा अभंग प्रसिद्ध आहे.
        
       वाघाट्याच्या फळांची भाजी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी  खातात. त्यामुळे पोटात गोविंद गोविंद असे होते असे जुन्या काळी वयस्कर लोकं सांगायची. म्हणून या फळाला #गोविंदफळ असेही नाव पडले असावे. भाजी जास्त प्रमाणात खाल्यास मळमळने,डोकेदुखी असे त्रास होतात. विदर्भात या फळाला वाघाटे म्हणतात, फळाची भाजी होते, फळात बिया फारच जास्त प्रमाणात असतात, फळातील बिया काढून फक्त टरफलाचीच ( वाघटयाची ) भाजी करतात, चण्याची डाळ घालून छान होते.
        चिमण्या वाचवायच्या असतील तर गावागावात व शहरात हजारो तरटीची झाडं लावली पाहिजेत. अशा झुडपांवर चिमण्या आणि इतर छोट्या पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असतो.

         आषाढी एकादशी निमित्त अजून एक संतांच्या निसर्ग सेवेची माहिती आपण करून घेऊ.

सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच विठ्ठल आणि आपल्या कामातूच विठ्ठलभक्ती दाखवली. सावता महाराजांचा हा कर्मयोग म्हणजे पर्यावरणपूजा होती, खरे अर्थाने ईश्वरपूजा होती.त्यांनी खरे अर्थाने निसर्गात संतूलन ठेवणारी आदर्श शेती त्यांनी केली.

त्यांची शेती प्रमुख पाच भागात विभागलेली होती.

पहिला भाग: दैनंदिन जीवनात लागणाऱ्या, रोज उत्पन्न देणाऱ्या बाबी जसे की, भाजीपाला, फळभाज्या, गूराढोरांना हिरवा चारा, देवाला-सजावटीला फूले.

दूसरा भाग : वर्षाला लागणारे धनधान्य गहू-ज्वारी-तांदूळ-दाळी- साखर- गूळ- कापूस- तेलबिया ( आजच्या भाषेत कॅशक्राॅप्स).

तिसरा भाग : लाकडासाठी झाडे, जळावू लाकूड, फर्निचर - बांधकामासाठी लाकूड, जसे की लिंब, साग.

चौथा भाग: जंगलशेती यात प्रामुख्याने औषधी वनस्पती, संरक्षक काटेरी झाडे, वर्षाकाठी फळ उत्पन्न देणारी झाडे. 

पाचवा भाग : अध्यात्मशेती जी महावृक्षांची लागवड. वड-पिंपळ-बेल-उंबर-करंज-पळस-लिंब-नांद्रुक-कवठ जी निसर्गात संतूलन ठेवणारी आदर्श शेती उत्पादने होत.

आणि हे सर्व करताना सावता महाराजांनी जलसंधारणालाही महत्व दिले माथ्याकडील भागात जलसाठा आणि पायथ्याकडे खात्रीचा जलस्रोत असलेली विहीर. दूधदूभत्यासाठी जनावरांचे पालन, गौ उत्पादनांची सोय आणि  सततपणे आपला मळा आपली जमीन उपजाऊ सूपीक ठेवण्यासाठीचे धोरण. 

त्यांनी शेती हि उत्पन्न मिळावे याकरिता कधीच केलेली नव्हती. आवश्यकतेपेक्षा जास्त त्यांनी कधीच मागितले नाही, जे स्वतःकडे शिल्लक ते उदारपणे ईतरांत वाटलेले. त्यांनी समृद्धीची व्याख्या धनधान्य -पैसाअडक्यात न करता निसर्गाची सेवा करताना मिळणाऱ्या आनंदात केली. आणि म्हणूनच ते सार्थ आयुष्य जगले. 

अध्यात्म हे "मानव आणि पर्यावरण संबंधाचे विज्ञान" होय, हे सांगणारे संत सावता महाराज आधूनिक वैज्ञानिकांच्या दृष्टीनेही मार्गदर्शकच. वर्तमान पिढीने या पर्यावरण सुसंगत जीवनपद्धतीचा जरूर अभ्यास करावा आणि जमले तर आचरणातही आणावा.

संत सावता महाराजांचे विचार मानत असाल तर मग, 
म्हणा

आपलं गाव हेच पंढरपूर 
गावचा निसर्ग हाच पांडुरंग 
गावची देवराई हिच रूक्मिनी
गावची नदी हिच चंद्रभागा 
गाव जपणारी वडिलधारी हेच संत
वेळोवेळी श्रमदान हिच वारी
प्रदूषणमुक्त शिवार हिच भक्ती 
निसर्गनियमांचे पालन हिच साधना 
गावात शुद्धसात्विक सलोखा हाच पांडुरंगाचा प्रसाद 

.... बोला "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय"

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ