Skip to main content

नारळ..,ऋणानुबंधाचे धागे

नारळ...

...हक्कसोडपत्रावर सह्या केल्यावर अंबीने पदरानं डोळे पुसले. दोन एकराच्या तुकड्यातली चिमूटभर जमीन विकण्याशिवाय शांतारामला गत्यंतर नव्हते. अंबीचं सासर खाऊनपिऊन सुखी होतं पण भाऊ अठरा विश्वे दारिद्र्यात...भाऊ दांडेकराला जमीन विकणं क्रमप्राप्त होतं. हक्कसोडपत्रावर सही हवी अंबीची, त्याशिवाय जमीन खरिदणार नाही असा भाऊचा कडक नियम होता. आता जेमतेम दोन एकराचा विश्वंभराच्या घाटीजवळचा तुकडा शांतारामकडे उरलेला होता. हक्कसोडपत्रावर सही करताना प्रॉपर्टीतला वाटा गेल्याचं दुःखं अंबीला अजिबात नव्हतं पण माहेरच्या नात्यातला शेवटचा धागा तुटल्यासारखा झालं होतं.

शांतारामची बायको पुढे आली, “अंबीवन्सं हक्कसोड झाली म्हणून नाती तुटली नाहीत हो. तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. मी बोलले यांना...पाटील मास्तरांच्या हद्दीजवळची म्हणजे तलावाशेजारची दोन नारळाची झाडं आजपासून तुमची हो... जे काही नारळ येतील वर्षाचे ते हक्काने घेत चला. आम्ही पूजेलाही त्यातला नारळ घेणार नाही बघा. शिवाय वाडी शेती तुमच्या भावाचीच आहे . कधीही या, पिकेल त्यातली मुठभर सुपारी आणि पायली दोन पायली भात मला जड नाही हो” अंबीने डोळे पुसले... आणि पुढची बरीच वर्षे अंबी त्या दोन नारळांचे नारळ घेत गेली.

परिस्थिती पालटली... अंबीच्या भरल्या घराला दृष्ट लागली. सासरीही टिचभर जमीन उरली. भक्कम सासऱ्यापाठोपाठ कर्तासरवता नवराही गेला. पदरी दोन मुली घेऊन अंबी खटपटीनं संसार करत होती. शांतारामानं त्या दोन नारळाच्या नारळांना कधी हातही लावला नाही. वाडीतून मारत्या आला आणि हातात चारपाच नारळ दिसले की शांताराम विचारायचा “कुठले रे?” मारत्या म्हणायचा, “दादा, तलावाजवळचे जुळे भाऊ नारळ बाणवली... पाटील मास्तरच्या वईजवळचे.. खाली पडलेले” मग शांताराम म्हणे, “रांडेच्या, ते बहिणीला दिलेत मी. असाच उलटपावली अंबीकडे जा. तिला नारळ दे आणि म्हणावं कोती तयार झालीयेत... पाडून घे म्हणावं” मग मारत्या तसाच दोन मैलावर अंबीकडे जाई...

काळ पुढे सरकत होता....अंबी गेली. जाण्याआधी शांतारामच्या संमतीने नारळांचे हक्क तिच्या मुलींकडे दिलेन. मोठी माई आणि धाकटी ताई... मग दोघी वहिवाटीचे नारळ घेत होत्या. शांताराम भाच्यांसाठी आनंदी होता. ताई गेली तरी ऋणानुबंध घट्ट होते. नारळांचं निमित्त होतं... मधे बरीच घटनांची मांदियाळी घडली... ताई आणि माई शहरात गेल्या. शांताराम गेला... मुलगा वाडी बघू लागला... आणि वादळात उरलेल्या पंचवीसेक नारळांसोबत हे दोघे नारळही गेले...ऋणानुबंध विसविशीत झाले. रक्ताच्या नात्यांना पुढच्या पिढीत अनोळखी गंध आले. चेहरे अपरिचित झाले....जुने करारमदार त्या माणसांसोबतच गेले....

ताई आणि माई आता मुंबईत पेन्शनीत आल्या. दोघींच्या सासुरवाड्या जवळच होत्या. एकदा एकेक चेक आणि एक पत्र दोघींच्या पत्त्यावर आलं. चेकवर पाच पाच हजाराचे आकडे होते आणि पत्रातला मजकूर होता. 

“नमस्कार, मी निलेश. शांताराम जोश्यांचा नातू. म्हणजे तुमचा लांबचा भाचा. बाबांना आजोबांच्या पश्चात वाडीशेती जमली नाही. ती आता मी करतो आहे. आपली जुनी वाडी आता मी गेली काही वर्षे नव्याने डेव्हलप केली आहे. एकदा जुन्या कागदपत्रांची तपासणी करताना..आजोबांनी वहिवाटीने अंबीआजीला दोन नारळाची झाडे उत्पन्नासह दिल्याचा उल्लेख आढळला. काही वर्षे ती वहिवाट सुरु होती... आज अंबीने नारळ उतरवले. अप्पा पाटलांनी नारळांचे रोख चौतिस रुपये दिले वगैरे उल्लेख आजोबांच्या जुन्या वहीत होते. नंतर वादळाने झाडं भुईसपाट झाली आणि परंपरा बंद झाली. नातीगोती दुरावली.... आपलाही परिचय नाही. म्हणून मीच माझ्या बुद्धीने नवीन वाडीतील दोन खास कलमी नारळाची झाडे उत्पन्नासह तुम्हाला देत आहे. तुम्हाला इथे येऊन उस्तवार करणं शक्य नसल्याने मीच त्या दोन्ही झाडांचे नारळ उतरवून पैसे वार्षिक पाठवत जाईन. आजही मी हेच म्हणेन की तुम्हाला दोन्ही आत्यांना माहेरची कमतरता भासली तर कधीही इथे या. कितीही दिवस माहेरपणाला रहा... तुमची झाडं बघा... त्यांना खतपाणी घालायला तरी या असं मला मनापासून वाटते. खाली नंबर दिला आहे. पत्र आणि चेक मिळाल्यावर अवश्य फोन करा”

-निलेश

दोघींनी साश्रू अंतःकरणानी ते पत्र उराशी कवटाळून धरलं. ज्यांनी करारमदार केले आणि ज्यांना ऋणानुबंधाचे धागे शेवटपर्यंत घट्ट ठेवायचे होते ती सगळी मंडळी आज निजधामाला गेली असली तरीही परंपरांचे प्रवाह मात्र आजही अखंडीत होते

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

माझ्या नात्यांतील सत्यघटनेवर आधारित

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...