Skip to main content

दीप पुजा


                               🌹दीप पुजा 🌹
कितीही गडद अंध:कार असला तरी सु्र्याच्या उदयाने अंधार नाहीसा होतोै.
 सुर्या इतका प्रकाशमान जरी नसलातरी एक छोटासा मिणमिणत्या दिव्यात सुध्दा अंधार मिटविण्याची शक्ति असते.
    आपल्या शेतीप्रधान देशात  उन्हाळ्यापासुन शेतीची तयारी सुरु होते.आषाढात पिके चांगलीच रुजतात, सगळीकडे गवत पसरलेले असते. आपली घरे शेतात असायची, बाजुला मोकळी जमीन ह्या दिवसात दिसत नसे. आजुबाजुची व शेतातील बीळे पावसामुळे बुजलेली असतात.गवत वाढलेले असते.ह्या गवतात वावरणारी सरपटणारे प्राणी जसे साप , गोम आपल्याला  दिसत नाही, चुकिने पाय पडला तर स्वसंरक्षणासाठी ते प्राणी चावतात. आषाढातील पावसाच्या झडीमुळे दिनकराचे दर्शनही  क्वचित होते.(अर्थात हल्ली पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आठवडाभर सुर्य दर्शन नाही असे फार कमी वेळा होते)प्रकाशाची प्रखरता कमी झालेली असते.  त्याकाळी विज नव्हती, ‘दाबले बटन की सर्वत्र प्रकाश ‘ अशी स्थिती नव्हती.त्यामुळे दिवे तयार हवे.कारण घरात देखील गोम, विंचु, साप निघत असे.
     म्हणुन ही दीप अमावस्या 🎈पणत्यांसाठी वाती , तेल तयार ठेवणे.,की दिवा चटकन तयार हवा.नंतरच्या काळात रॉकेलचे कंदील असत , त्ते काजळी धरत.त्यांची काच साफ करणे, केव्हा ही गरज पडली तर पटकन दिवा तयार हवा ह्याची तयारी करणे.,संतत एक दिवा प्रज्वलित ठेवणे की जेणेकरुन हे उपद्रवी प्राणी आपल्याला दिसतील आणी आपण आपले संरक्षण करु शकु.
        आपल्या मनातील अंध:कार दुर करण्यासाठी पुर्ण सुर्य नाही तर एक आशेचा किरणही पुरेसा आहे. असाही संदेश 🪔 प्रज्वलित दीप देतो. 
       तुम्ही मशागत केली आहे. उत्तम प्रतिचे बीज पेरले आहे. वरुण राजाची कृपा आहे , शेत बहरले आहे, 👌’हे अन्नदाता !शेतकरी मित्रा !तु आता थोडी विश्रांति घे. चांगले पिक येणार, सुगीचे दिवस येणार ‘हा आशेचा किरण शेतकर्याला सुखावतो. आनंद देतो .
     अशा ह्या दीप पुजनाने आपणसर्वांनी प्रसन्नतेचा ,आनंदाचा अनुभव घ्यावा ही ईश चरणी प्रार्थना 🙏

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...