Skip to main content

मधुमालती

#मधुमालती
🌸🌿🌸🌿

नावातच मधु असलेली आणि उसाच्या पेरांपेरांत साखर भरलेली असते तशी देठादेठांत मध भरलेली ही मालतीची फुलं आपल्यालाच काय तर काळ्या मुंग्यांनाही माहित असतात.😁त्याशिवाय का त्या दिवसभर फुलांच्या आत बाहेर करत मध गोळा करतात?😛म्हणजे नावात काय आहे असं विचारणा-यांनाही कळेल की मधुमालतीची वेल आणि तिच्यावर येणारी फुलं हे प्रकरण किती गोड आहे ते !☺ही मधु आणि मालतीची जोडी पूर्वी लग्नात नाव ठेवतानाही आढळायची.म्हणजे नव-याचं नाव मधुकर किंवा मधुसूदन असेल तर बायकोचं नाव बदलताना त्याला हमखास मालतीच सुचवलं जायचं 😜 इतकी ही जोडी फेमस होती.मी पाचवीत रोह्याला असताना बाबांच्या एका मित्राकडे जाऊन "मधुकाका...उद्या संध्याकाळी आमच्या घरी हळदीकु़ंकवाला मालतीकाकूंना पाठवा" असं बेधडक निमंत्रण दिलं होतं.मग काकांनी हसत हसत सांगितलं की नक्की पाठवतो पण काकूचं नाव मोहिनी आहे ! 🙈म्हणजे तिथे नियमाला अपवाद होता.🤗हिचं नावच इतकं गोड आहे की सिंहासन बत्तिशी लिहितानाही नवव्या पुतळीचं नाव मधुमालती ठेवण्याचा मोह लेखकाला आवरता आला नाही ! तर अशी ही मधुमालती ही भारतीय वंशाची सदाहरित वेलवर्गीय वनस्पती.#कॉम्ब्रेटम_इंडिकम 
(Combretum Indicum)हे तिचं शास्त्रीय नाव असून ती #कॉम्ब्रेटेसी या कुळातील आहे.इंग्रजीत रंगून क्रीपर (Rangoon Creeper) हिंदीमध्ये माधवीलता,संस्कृत मध्ये माधवी किंवा अतिमुत्तलता या नावांनी ओळखली जाते.मधुमालतीची वेल सदाहरित प्रकारची असून तिला जागा मिळाली तर हातपाय पसरुन झुडूप तयार होतं आणि उंच जाण्यासाठी आधार मिळाला तर सत्तर फुटांपर्यंत वरवर जाण्याची तिची तयारी असते.ही वेल घरासमोरील प्रवेशद्वाराच्या कमानीवर सोडण्यासाठी किंवा बागेत लावण्यासाठीही सुंदर आहे.हिची साल तपकिरी रंगाची वर खवले असलेली,तर पानं सुरुवातीला लालसर, मग पोपटी व नंतर हिरव्यागार रंगाची,साधी पण चिवट, समोरासमोर,लांबटगोल आकाराची आणि दोन्हीकडे महिरपी कंसाच्या टोकासारखी टोकदार असतात.कळ्या अगदी लहान असताना हिरवट,मग गुलाबीसर पांढ-या रंगाच्या होतात.फुलं फुलताना पाच पाकळ्यांची पांढरी, पाठीवर गुलाबी पट्टा असलेली संध्याकाळच्या वेळी फुलून आसमंत गोड सुगंधाने भरुन टाकतात.दुस-या दिवशी तीच फुलं फिकट गुलाबी रंगाची व तिस-या दिवशी लाल होऊन गळून पडतात.या फुलांमध्ये दहा केसर दलं असतात.मधलं एक सर्वात मोठं असतं त्यापासून एकच गोलसर बी बनते. आपल्याकडे #कोकणात या वेलींवर फुलं भरपूर अगदी घोसाघोसांनी लटकताना दिसतात मात्र बिया कधीच दिसत नाहीत.ही फुलं फांद्यांच्या टोकांना येत असल्यामुळे त्याचे निसर्गनिर्मित गुच्छ बघायला मिळतात.ही फुलं काढणं हे अतिशय नाजूक काम आहे.कारण एकाच गुच्छात तिन्ही रंगाची फुलं आणि कळ्याही असतात.जरा जोरात हात लागला की पाकळ्या पडतील की काय वाटतं.अलगदपणे देठं खुडताना चुकून मधेच कळी येणार नाही याची काळजी घ्यावी  लागते.एकाच गुच्छात परवाची लाल, कालची गुलाबी आणि आजची पांढरी अशी तिरंगी फुलं, त्यातल्या मधाचा गोड घमघमाट,काळ्या मुंग्या,मधमाशा, भुंगे आणि पक्ष्यांचा मुक्त संचार आणि नि:शब्द कातरवेळी  ऐकू येणारा गुंजारव हे सगळंच वातावरण भारून टाकणारं असतं.बारमाही फुलं देणारी मधुमालती वसंत ऋतूत मात्र अंगोपांगी बहरते.चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाला देवीच्या सजावटीसाठी मोठे मोठे गुच्छ वापरता येतात.फुलांच्या
दोरा न घेता एकात एक देठं गुंफून माळा करता येतात. मधुमालतीची मुळं,खोड,पानं,फुलं,बिया हे सारं काही  औषधी आहे.तसंच ही पानं हवेतला कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन सोडून हवा शुद्ध करण्याचं काम करतात.डोकेदुखी,पोटदुखी,अतिसार,ताप, कृमी यांसारख्या अनेक रोगांवरील औषधात या वनस्पतीचा वापर करतात.ही वेल अतिशय वेगाने वाढते आणि तिची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.मुळं आडवी पसरत जाऊन त्यांना फुटवे फुटून रांगेत नविन रोपं आपोआप रुजून येतात.जास्त कौतुक करावं लागत नसल्यामुळे हल्ली ब-याच सार्वजनिक उद्यानांमध्ये मधुमालती आढळते.हिच्या विकसित जातींमध्ये आता जास्त उंच न वाढणारी,आखूड देठं आणि आकाराने लहान फुलं येणारी रोपं नर्सरीत मिळतात.गच्चीवर,बाल्कनीत कुठेही कुंडीत लावावी आणि सुगंधाचा आनंद लुटावा.अशी मधुमालती प्रत्येकाने आपल्या घरी लावावीच आणि वातावरण शुद्ध करण्यास मदत करावी असं मला वाटतं !

#स्वाती_जोशी_रत्नागिरी.
दि.४ एप्रिल,२०२१.

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...