Skip to main content

Posts

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.

विडा किंवा तांबूल महत्व व संबंधित कथा.... ---------------- १ )तांबूल प्रदान : देवीला विडा हा आत्यंतिक प्रिय आहे. विडा हा ही रजोगुणी आहे. त्रयोदशगुणी विडा तिला आत्यंतिक प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्त्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, तिला प्रिय आहेत. -------------------------  २)तांबूल ऊर्फ विडा  ‘विडा’सुद्धा सर्व थरांतल्या लोकांमध्ये प्रिय आहे.   तांबूल म्हणजे कात , चुना, सुपारी इत्यादी पदार्थ घालून केलेला नागवेलीच्या पानाचा विडा. हा त्रयोदशगुणी असावा असा संकेत आहे. ते तेरा गुण म्हणजे तिखटसर, कडवट, उष्ण, मधुर, खारट व तुरट, वातहारक, कृमिनाशक, कफहारक, दुर्गंधी नाहीशी करणारा, मुखाची अशुध्दी नाहीशी करून मुखाला शोभा आणणारा, कामाग्नी उद्दीपीत करणारा...  ‘योगरत्नाकर’ ह्या ग्रंथातील एका श्लोकामध्ये हे सर्व वर्णन दिले आहे. त्यात विड्याचे घटक म्हणून पदार्थ दिले आहेत, नागवेलीची पाने, सुपारी, कात , चुना , कापूर , कस्तुरी, लवंग , जायफळ व तंबाखू . तंबाखूमुळे दंतरोग शमन होतो, तसेच कृमी व कंड नाश पावतात.   व...

वनस्पतींची निसर्गऊर्जा

वनस्पतींची निसर्गऊर्जा -                                                              रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून  ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..जंगलातल्या काही जागा मंगल वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊ...

शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा

*शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा*     पानिपत!हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लाखभर मराठ्यांनी प्राणाहुती दिलेले स्थान! मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे युध्द,महायुद्धच! मराठ्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा धगधगता अविष्कार! मराठ्यांनी हारूनही जिंकलेले युध्द!       या प्रचंड रणसंग्रामात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध मराठी सरदारांच्या, वीरांच्या समवेत लढले होते पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांचे पुत्र समशेर बहादूर. प्राणांतिक जखमांनी घायाळ झालेल्या समशेर बहादूरांनी अखेरचा श्वास घेतला तो भरतपूरमधे.याच समशेर बहादूरांच्या कबरीचा शोध मला कसा लागला त्याची हकीकत या लेखात नमूद करीत आहे.      महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील शिवरायांचे किल्ले पाहण्याच्या प्राथमिक उद्देशाने  १९९० मधे सुरु झालेली माझी दुर्गदर्शन यात्रा पुढे खूप विस्तारत गेली.इतिहास घडविणाऱ्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन आणि शोध हा महत्वाचा विषय या यात्रेत समाविष्ट झाला.२००६ पर्यंत जवळपास तीनशे किल्ले पाहिले आणि शंभराहून अधिक महत्वाच्या मराठी वीरांच्या समाधीस्थळां...

मधुमालती

#मधुमालती 🌸🌿🌸🌿 नावातच मधु असलेली आणि उसाच्या पेरांपेरांत साखर भरलेली असते तशी देठादेठांत मध भरलेली ही मालतीची फुलं आपल्यालाच काय तर काळ्या मुंग्यांनाही माहित असतात.😁त्याशिवाय का त्या दिवसभर फुलांच्या आत बाहेर करत मध गोळा करतात?😛म्हणजे नावात काय आहे असं विचारणा-यांनाही कळेल की मधुमालतीची वेल आणि तिच्यावर येणारी फुलं हे प्रकरण किती गोड आहे ते !☺ही मधु आणि मालतीची जोडी पूर्वी लग्नात नाव ठेवतानाही आढळायची.म्हणजे नव-याचं नाव मधुकर किंवा मधुसूदन असेल तर बायकोचं नाव बदलताना त्याला हमखास मालतीच सुचवलं जायचं 😜 इतकी ही जोडी फेमस होती.मी पाचवीत रोह्याला असताना बाबांच्या एका मित्राकडे जाऊन "मधुकाका...उद्या संध्याकाळी आमच्या घरी हळदीकु़ंकवाला मालतीकाकूंना पाठवा" असं बेधडक निमंत्रण दिलं होतं.मग काकांनी हसत हसत सांगितलं की नक्की पाठवतो पण काकूचं नाव मोहिनी आहे ! 🙈म्हणजे तिथे नियमाला अपवाद होता.🤗हिचं नावच इतकं गोड आहे की सिंहासन बत्तिशी लिहितानाही नवव्या पुतळीचं नाव मधुमालती ठेवण्याचा मोह लेखकाला आवरता आला नाही ! तर अशी ही मधुमालती ही भारतीय वंशाची सदाहरित वेलवर्गीय वनस्पती.#कॉम्ब्र...

शरीरी वसे रामायण

|| *शरीरी वसे रामायण* || जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१|| श्वास, प्राण हा मारुतराया, फिरतो जगवित आपुली काया | या आत्म्याचे करीतो रक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||२|| नील जाम्बुवंत रक्त नसा या, फिरती शोधत जनक तनया गर्वच म्हणजे असतो रावण शरीरी आपुल्या वसे रामायण ||३|| रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर, भाव भावना त्यातील वावर मोहांधता करी आरोग्य भक्षण शरीरी आपुल्या वसे रामायण ||४|| नखें केंस त्वचा शरीरावरती, शरीर नगरीचे रक्षण करती बंधु खरे हे करती राखण शरीरी आपुल्या वसे रामायण ||५|| क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो, शांत असता घोरत पडतो डिवचताच त्या करी रणक्रंदन शरीरी आपुल्या वसे रामायण ||६|| गर्वे हरले सौख्य मनाचे कांसाविस हो जीवन आमुचे संकटी येई शरीर एकवटून शरीरी आपुल्या वसे रामायण ||७|| मनन करता भगवंताचे, रक्षण होईल आरोग्याचे राम जपाचे अखंड चिंतन शरीरी आपुल्या वसे रामायण ||८|| ||  *श्रीरामार्पणमस्तु*  ||🙏🏻

साबुदाणा खिचडी

*साबुदाणा  खिचडी*                                  *पोर्तुगीज भारतात आले म्हणून आपल्या उपवासाची सोय झाली*  आपल्या पैकी अनेकांनी उपवास केला असेलच.  बऱ्याचजणांनी श्रद्धेपोटी केलाय  तर  काहीजणांनी फक्त साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी  म्हणूनच उपवास केलाय.  आज सगळ्यांच्या डब्ब्यात खिचडी हमखास आढळते. साबुदाण्याची खिचडी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय उपवासाचा पदार्थ.  पण याचा आणि उपवासाचा काय संबंध हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय काय? साबूदाणा खिचडीचा  इतिहास आपण जाणूनच घेतला नाही. भगवान भोलेनाथ शंकराचा वाढदिवस होता. माता पार्वतीने सगळी तयारी केली पण गणपतीने ते सगळ जेवण संपवलं. भगवान शंकराना उपवास घडला. पार्वती देवीनी आयडिया केली. झटपट साबुदाने भिजत घातले आणि त्याची मस्त खिचडी बनवली. भोलेनाथाला ती खिचडी आवडली तेव्हा पासून त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला जो कोणी भक्त उपवास करेल आणि साबुदाणा खिचडी खाईल त्याच्यावर मी प्रसन्न होईन. सॉरी बॉस.  ...

ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा

शिव आणि पार्वती हे दैवतांचे युगुल मोठे अद्भुत आहे. ते आम्हा माणसांसारखेच एकमेकांवर अतिशय उत्कट प्रेम करतात, एकमेकांसवे सारीपाट खेळतात, तो प्राप्त व्हावा म्हणून ती एक पान फक्त खाऊन तप करते अपर्णा होते.  रात्री आकाशमार्गे विहार करताना कुणा दीनदुबळ्या माणसांची दुःखे पाहून तिला दया यावी अन त्याने तात्काळ वर देऊन माणसांना दुःखमुक्त करावे. तो तिच्या यज्ञप्रवेशानंतर क्रोधाने बेभान तांडव करतो. ती असताना तर तो तिच्यात प्रेमात इतका मग्न असतो की त्याची आरती करताना समर्थ रामदास  " ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा " अशी गुलाबी ओळ लिहितात.  कुणा अनाम शिल्पकाराने या दैवि युगुलाच नातं आपल्या कल्पनाशक्तीने पाषाणात कस उतरवलय ते या फोटोत पहा. अमृतमंथनात वासुकी नागाच्या मुखातून हलाहल विष बाहेर पडलय, ते कोण स्वीकार करणार ? विश्वाच्या कल्याणासाठी  कर्पूरगौरम् करूणावतारम् असा भगवान शिवशंकर ते हलहल प्राशन करतो विषाच्या प्रभावाने कंठ काळानिळा होतो. शिल्पकाराने या मूर्तीत आजवर मी कुठेच न वाचलेली पुढची कथा पाषाणात कोरली आहे. महादेवाच्या बाजूला सखीपार्वती उभी आहे. तिने आपला हात त्या नीलकंठ महादेवाच्य...